ठाण्यात पार पडलं कुत्र्याचं वर्षश्राद्ध!

ठाणे : काहीजण आपल्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम करतात. त्यांना आपल्या कुटुंबातील एक सदस्य असल्यासारखी वागणूक देतात. अशाच एका पाळीव कुत्र्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबाने आपल्या निधन झालेल्या पोमेलियन कुत्र्याचे वर्षश्राद्ध घालून पाळीव कुत्र्यावर असलेल्या प्रेमाची परतफेड केली आहे. हिंदू धर्मात श्राद्ध विधीला विशेष महत्त्व असून, श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी जो पितरांना समाधान देतो, अशी श्रद्धा आहे.



ठाण्याच्या खोपट येथील दर्शन टॉवरमध्ये राहणाऱ्या किरण जाधव यांच्या घरी असलेल्या पोमेलियन कुत्र्याचं रविवारी वर्षश्राद्ध ठाण्याच्या कोपनेश्वर मंदिरामध्ये करण्यात आले़ किरण जाधव यांचा मुलगा केतन यांनी हे कार्य आज केले़ गुरुजी सचिन कुलकर्णी यांनी विधी पार पाडले. सदर कुत्र्याचं निधन गेल्यावर्षी २८ मे ला झाले होते. त्यावेळी माणसाप्रमाणे त्याचे विधी करण्यात आले होते़ सदर कुत्र्याचे नाव शीरो असून हा गेले पंधरा वर्षे त्यांच्या घरामध्ये होता आणि त्याला मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळले होते. ठाण्यात कुत्र्याचे वर्षश्राद्ध घातल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.

Comments
Add Comment

Uday Samant : ठाणे अंतर्गत मेट्रोसाठी नागरिकांना विश्वासात घेणार

एक महिन्याच्या आत संयुक्त बैठक घेण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन मुंबई : ठाणे शहरासाठी प्रस्तावित

Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक

Eknath Shinde : 'घर म्हणजे चार भिंती नव्हे, तर स्वप्नांचा महाल'; ठाण्यात जय भवानी सोसायटीतील रहिवाशांचे गृहस्वप्न पूर्ण

- रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे : "घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत, तर ते प्रेम,

Thane Palghar DCC Bank : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून ‘सहकार

Bhiwandi Fire : मुंबई-नाशिक महामार्गावर आगीचा महाभडका! टायर-लाकडी गोदामासह अनेक दुकानं आगीच्या विळख्यात

भिवंडी : भिवंडी शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावरील निम्बोळी परिसरात रविवारी (२८ जून) टायर आणि लाकडी पॅलेटच्या

Road Development : ३० ते ४० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटात होणार; कल्याण, शिळफाटा

मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील