मुंबई : रस्ता, नदीचे रुंदीकरण, जलवाहिन्या शेजारी बांधकाम अशा विविध प्रकल्पात बाधितांना आता २५ ते ४० लाखांपर्यंत मोबदला मिळणार आहे. पालिकेच्या नवीन धोरणाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. दरम्यान एखाद्या प्रकल्प बाधिताच्या घराची किंमत २५ लाखांपेक्षा कमी असली तरी त्या बाधिताला २५ लाखांचा मोबदला देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करताना पर्यायी जागेत जाण्यास नकार देणाऱ्या बाधित कुटुंबाला आता सदनिकेऐवजी आर्थिक मोबदला देण्याच्या धोरणात प्रशासनाने बदल केला आहे. पात्र गाळे धारकाला ३० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेच्या या निर्णयाला मंजुरी देत स्थायी समितीने या रकमेत वाढ करत ५० लाख रुपयांपर्यंत मोबदला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने धोरणात बदल करत कमीत कमी २५ लाख आणि जास्तीत जास्त ४० लाख रुपये एवढा आर्थिक मोबदला देण्याचे धोरण ठरवले आहे.
पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी या नवीन धोरणाला मंजुरी दिल्याने प्रकल्पबाधितांना नवीन धोरणानुसार मोबदला मिळणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…