सनियंत्रण समितीच्या दिरंगाईमुळेच ई-रिक्षा बंद

माथेरान (प्रतिनिधी) : माथेरानकरांना हवीहवीशी वाटणारी सुलभ, स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणारी ई-रिक्षाची सेवा सनियंत्रण समितीच्या दिरंगाईमुळे धूळखात पडून आहेत. या समितीच्या गलथान कारभाराबाबत स्थानिक भूमिपुत्रांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



माथेरान हे प्रदूषणमुक्त ठिकाण असल्याने इथे पऱ्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टाने ५ डिसेंबर २०२२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी रिक्षा सुरू केल्या होत्या. त्यावेळी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. सर्वांनीच याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला होता. शालेय विद्यार्थी, अपंग, रुग्ण त्याचप्रमाणे पर्यटकांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास या माध्यमातून मिळाला होता. महिंद्रा कंपनीच्या एकूण सात रिक्षांच्या साहाय्याने तीन महिने पर्यटनाला उत्तम प्रकारे चालना मिळाली होती.



५ मार्चपर्यंत रिक्षाची मुदत संपुष्टात आल्यानंतर याबाबतचा अहवाल नगर परिषदेने सनियंत्रण समितीला सुपूर्द करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यासाठी दिला होता. सदर अहवाल सनियंत्रण समितीने २४ एप्रिल पूर्वी सादर करणे अपेक्षित होते; परंतु या समितीने अहवाल सादर केला नाही. सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेल्या या समितीच्या पदाधिकाऱ्यांना एखादी विधायक आणि लोकांना अभिप्रेत कामे करणे शक्य होत नसेल, तर ही समिती बरखास्त करून टाकावी आणि शासनाने जनतेला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवासुविधा प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.



सभा झालीच नाही



या पूर्वीच्या रंगनाथन व विलास गोरडे यांच्या कार्यकाळात सनियंत्रण समिती माथेरानला सभा घेत असे, त्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्यासोबत संवाद साधता येत असे, के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली याच समितीने दीड वर्षांत एकही सभा माथेरानला घेतलेली नाही.


"सनियंत्रण समितीचे सदस्य डेविड कार्डोज यांनी ई-रिक्षाची चाचणी पावसाळ्यात करणे सुद्धा आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. कोर्टात तत्काळ सूनवाई न मिळाल्यास पावसाळा संपेल, कारण सध्या कोर्टाला सुट्टी आहे. जुलैमध्ये कोर्ट सुरू होईल. तोपर्यंत नगर परिषदेच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करून आणलेल्या या ई- रिक्षा नादुरुस्त होण्याची भीती श्रमिक हातरिक्षा संघटनेकडून व्यक्त केली जात आहे".
- शकील पटेल, अध्यक्ष, श्रमिक रिक्षा संघटना

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य