मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण कामात कंपनीचा अतिरेक

साखरपा : सध्या रत्नागिरी-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सुरुवातीला रस्त्यांवरील मोठमोठी झाडे तोडण्यात आली. त्यानंतर टप्प्या टप्प्यात रुंदीकरण व रस्ता कटाई कामाला प्रारंभ झाला. सध्या साखरपा गावात हायवे बाधित बांधकामे तोडण्यास अचानक प्रारंभ झाला आहे. कंपनीला २ वर्षे कामाची मुदत असून लवकरात लवकर घरे खाली करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र या आधी कोणतीही सूचना किंवा नोटीस कोणालाही प्राप्त झालेली नाही. त्यातच अचानक पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरादारांवर जेसीबी फिरविण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.


पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अशाप्रकारे कंपनीच्या अरेरावी विरोधात स्थानिक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ऐन पावसाळ्यात कुठे जायचे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे. तसेच काही घरांना कुलूप असताना बांधकामे तोडली जात आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यावेळी पाण्याचे मोठमोठे प्रवाह वाहतात. अशा वेळी मोठमोठे मातीचे ढीग करून मातीचे रस्ते तयार केले आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणात चिखल होऊन अपघात घडू शकतात. याची कोणतीही खबरदारी कंपनीने घेतली आहे का असा सवाल येथील नागरिकांतून तसेच प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. फक्त कामाचा वेग असून चालत नाही, प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे.


काही ठिकाणी घरे तोडण्याबाबत नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सहकार्याच्या भूमिकेत असून कंपनी प्रशासन मात्र हातोडा फिरवत आहे. तसेच काही ठिकाणी मोबदला मिळाला नसूनसुद्धा बांधकाम हटविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे कसे लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची