मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण कामात कंपनीचा अतिरेक

साखरपा : सध्या रत्नागिरी-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सुरुवातीला रस्त्यांवरील मोठमोठी झाडे तोडण्यात आली. त्यानंतर टप्प्या टप्प्यात रुंदीकरण व रस्ता कटाई कामाला प्रारंभ झाला. सध्या साखरपा गावात हायवे बाधित बांधकामे तोडण्यास अचानक प्रारंभ झाला आहे. कंपनीला २ वर्षे कामाची मुदत असून लवकरात लवकर घरे खाली करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र या आधी कोणतीही सूचना किंवा नोटीस कोणालाही प्राप्त झालेली नाही. त्यातच अचानक पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरादारांवर जेसीबी फिरविण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.


पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अशाप्रकारे कंपनीच्या अरेरावी विरोधात स्थानिक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ऐन पावसाळ्यात कुठे जायचे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे. तसेच काही घरांना कुलूप असताना बांधकामे तोडली जात आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यावेळी पाण्याचे मोठमोठे प्रवाह वाहतात. अशा वेळी मोठमोठे मातीचे ढीग करून मातीचे रस्ते तयार केले आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणात चिखल होऊन अपघात घडू शकतात. याची कोणतीही खबरदारी कंपनीने घेतली आहे का असा सवाल येथील नागरिकांतून तसेच प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. फक्त कामाचा वेग असून चालत नाही, प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे.


काही ठिकाणी घरे तोडण्याबाबत नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सहकार्याच्या भूमिकेत असून कंपनी प्रशासन मात्र हातोडा फिरवत आहे. तसेच काही ठिकाणी मोबदला मिळाला नसूनसुद्धा बांधकाम हटविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे कसे लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह