किर्तीकर यांचे गैरसमज दूर करु, युती मजबूत आहे

दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण


मुंबई: भाजप व शिवसेनेची युती घट्ट असून खासदार गजानन कीर्तीकर यांचे काही गैरसमज असतील तर दूर करू. भाजप व शिवसेनेत जागावाटपावरून कोणताही वाद नाही. युती मजबूत आहे, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.


खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा जाहीर आरोप केला होता. यावर आज पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. दीपक केसरकर म्हणाले, कीर्तिकर यांचे काही काम होत नसेल किंवा गैरसमज असतील तर ते चर्चेतून दूर केले जातील. लोकसभेसाठी युतीत २०१९ चाच फॉर्म्युला राहील. अंतिम निर्णय दोन्ही नेत्यांचा असेल. कोकणातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ते म्हणाले, मी राज्यातच खुश आहे.



संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे


दीपक केसरकर म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. विधानसभेतील ते सर्वोच्च नेते आहेत. तरीही संजय राऊत त्यांना अक्षरश: धमक्या देतात. त्यामुळे संजय राऊतांवर तातडीने हक्कभंगाची कारवाई झाली पाहीजे. त्यांच्यावर अद्याप हक्कभंग का झाला नाही, हा एक प्रश्नच आहे.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील