किर्तीकर यांचे गैरसमज दूर करु, युती मजबूत आहे

दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण


मुंबई: भाजप व शिवसेनेची युती घट्ट असून खासदार गजानन कीर्तीकर यांचे काही गैरसमज असतील तर दूर करू. भाजप व शिवसेनेत जागावाटपावरून कोणताही वाद नाही. युती मजबूत आहे, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.


खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा जाहीर आरोप केला होता. यावर आज पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. दीपक केसरकर म्हणाले, कीर्तिकर यांचे काही काम होत नसेल किंवा गैरसमज असतील तर ते चर्चेतून दूर केले जातील. लोकसभेसाठी युतीत २०१९ चाच फॉर्म्युला राहील. अंतिम निर्णय दोन्ही नेत्यांचा असेल. कोकणातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ते म्हणाले, मी राज्यातच खुश आहे.



संजय राऊतांवर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे


दीपक केसरकर म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. विधानसभेतील ते सर्वोच्च नेते आहेत. तरीही संजय राऊत त्यांना अक्षरश: धमक्या देतात. त्यामुळे संजय राऊतांवर तातडीने हक्कभंगाची कारवाई झाली पाहीजे. त्यांच्यावर अद्याप हक्कभंग का झाला नाही, हा एक प्रश्नच आहे.

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा