स्व. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जो मानसन्मान देतात तेवढा उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेबांना कधी दिला नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना जाहीर सभेतून कसे अपमानित करून पाठवले, हे संपूर्ण राज्यातील जनतेने पाहिले आहे. अशा लोकांना आडवाणी किंवा भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली.



पुढे नितेश राणे म्हणाले की, सकाळी उठून संजय राऊत हे संसद भवन उद्घाटनाची तीच तीच टेप वाजवित आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल बोलत आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी लवकरच बरे होतील. तेव्हा संजय राऊत त्यांच्याबद्दल तेव्हाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे कसे वागले हे सांगतील काय? शिवसेनेत राऊत यांच्यापेक्षा कित्येक उन्हाळे, पावसाळे जास्त पाहिलेले नेते आहेत. मनोहर जोशी हे सेनेचे काम करत होते, तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये विरोधात लिहीत होता. जेव्हा ते शिवसेना वाढवत होते. तेव्हा उद्धव ठाकरे हे फोटो काढायला कॅमेरा साफ करत होते. मात्र याच माजी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांना जाहीर सभेतून कसे अपमानित करून पाठवले हे संपूर्ण राज्यातील जनतेने पाहिले आहे. दिवाकर रावते, रामदास कदम अशा अनेकांचा अपमान कशा प्रकारे केलात? हे आम्हाला माहीत आहे. संसद भवनच्या कार्यक्रमात तुम्हाला आमंत्रणच नाही. कारण तुमचा पक्षच राहिलेला नाही. असे असताना बहिष्काराची भाषा करता, असे खडे बोलही नितेश राणे यांनी सुनावले.

Comments
Add Comment

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी