मुंबई : एकीकडे मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राज्य सरकार राबवीत आहे, तर दुस-या बाजूला बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईमधल्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या धोक्याच्या सूचनेमुळे या इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतल्या अतिधोकादायक आणि मोडकळीला आलेल्या तब्बल २२६ इमारतींची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या २२६ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगर विभागात ६५, तर पश्चिम उपनगर विभागात १२६ इमारती समाविष्ट आहेत.
धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं, असं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी प्रशासनाच्या वतीने केलं आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…