सावित्री नदीच्या काठावर संरक्षक कठड्यांच्या बांधकामाला वेग

पोलादपूर (प्रतिनिधी) : २०२१ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्यालगतचे संरक्षक कठडे कोसळलेल्या ठिकाणी गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चरने कठडे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी रानबाजिरे धरणापासून सावित्री नदीचे पात्र भरधाव वेगाने येऊन आदळत असल्याने या गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चर पध्दतीचे कठडे आगामी काळात किती तग धरू शकतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.



कुडपण येथे वऱ्हाडाचा टेम्पो गॅबियन नेटवर्क स्ट्रक्चर तंत्राच्या संरक्षक कठड्याला धडकल्यानंतर गॅबियन तंत्राच्या ठिकऱ्या उडवत दरीत कोसळून तीन जण ठार तर अनेकजण जखमी झाले होते. यामुळे हे तंत्र संरक्षक कठडे बांधण्याकामी कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले होते. यापूर्वी येथे १०० मीटर्स लांबीची काँक्रीटची संरक्षक भिंत काही वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. मात्र २०२१ च्या महापुरामध्ये ती वाहून गेली. आता या ठिकाणी गॅबियन नेटवर्क पद्धतीचे स्ट्रक्चर उभारून कठडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी नदीपात्र आणि रस्त्यालगत तब्बल चार मीटरचा मोठ्या दगडांचा भराव करण्यात आला असून त्यावर दगड, गोटे, कपाऱ्या आणि खापऱ्यांची लोखंडी जाळीमध्ये बांधणी करून कठडा उभारला जात आहे. यामध्ये कोठेही सिमेंट काँक्रीटचा वापर करण्यात आला नाही. या पध्दतीचे काम टीकावू नसते. त्यामुळे पुन्हा पावसाळयात ते वाहून जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह