बोईसर स्थानकात प्रवाशांचा रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास

बोईसर : बोईसर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोन ते एक या स्थानकांच्या दरम्यान प्रवास करणारे अनेक प्रवासी पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे रुळांवर उड्या मारुन लोहमार्ग पोलिसांची भीती न बाळगता रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करत आहेत. इतकेच नव्हे, तर ट्रेनमध्ये विरुद्ध दिशेने जीवावर बेतू पाहणारी प्रवाशांची चढ-उतार लोहमार्ग पोलिसांच्या समोर होत असताना प्रवासी सुरक्षेबाबत सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.



बोईसर पश्चिमेस तारापूर एमआयडीसी, नागरी वसाहती, अणुऊर्जा प्रकल्प तसेच अनेक लघुउद्योग आहेत. या ठिकाणी रोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दोन ते पाच लाखांच्या घरात आहे. मागील अनेक महिन्यांपासून प्रवासी अशा पद्धतीने प्रवास करत असताना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासणीस याविषयी कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याने प्रवाशांनाही बळ मिळत आहे. याबाबत अनेक जागरूक प्रवासी मात्र वारंवार तक्रारी करत आहेत.



रेल्वे मार्गात उडी मारुन गटार, दगडी खडी, लोखंडी गज ओलांडताना जर पायाला ठेस लागली व विपरित घटना घडली आणि त्याच वेळी एखादी ट्रेन आली, तर प्रवाशाच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. संध्याकाळच्या वेळेत, तर विदारक चित्र पाहावयास मिळत असते. या गर्दीच्या वेळेत सर्रासपणे प्रवासी झुंडीच्या झुंडीने रेल्वे मार्ग ओलांडून ये-जा करत असतात.



‘त्या’ प्रवाशांवर कारवाईची मागणी...
रेल्वे स्थानकात लिफ्ट, स्कायवॉक, इच्छित स्थळी जिने असताना प्रवासी हा जीवघेणा प्रवास करत असल्याने अनेक जागरूक पनागरिक याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान याविषयी कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फलाट क्रमांक एकवर स्थानक व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस ठाणे आहे. तरीही रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात नाही. तरी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



रेल्वे मार्गात फलाट दोन आणि एक यांच्यामध्ये लोखंडी जाळीचे अडथळे निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरून कुठलाही प्रवासी अशा प्रकारची कृती करणार नाही. मात्र सुरक्षेच्या बाबतीत येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना