‘सेंट्रल व्हिस्टा’तून दरवर्षी एक हजार कोटी वाचणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची विविध कार्यालये आहेत. ते एकाच ठिकाणी नाही. त्यासाठी त्याचे भाडे, वाहतूक व्यवस्था, कर्मचारी, अधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवनात केंद्र सरकारची सर्व कार्यालये एकाच छत्राखाली येणार आहेत. येत्या २८ मे रोजी या नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत या नव्या भवनामुळे सरकारी तिजोरीतील दरवर्षी एक हजार कोटी वाचणार आहेत,असा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.



एका अहवालानुसार या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एकूण खर्च हा २५ हजार कोटी रुपये येणार आहे. यात एक हजार कोटी रुपये नवीन संसद भवन निर्माण करण्यासाठी लागले आहेत. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.



कोरोना काळात सुरू असलेल्या या प्रकल्पाचा कामावर विरोधकांनी टीका केली होती. मात्र देशासाठी हा प्रकल्प किती उपयुक्त आहे, असा दावा करीत मोदी सरकारने याचे काम सुरूच ठेवले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार असला तरी हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Agni-1 Missile : ओडिशात करण्यात आली अग्नी १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताचा शत्रुराष्ट्रांना स्पष्ट इशारा

ओडिशा : भारताने आपल्या सामरिक क्षमतेत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ओडिशातील एकात्मिक चाचणी श्रेणी

Supreme Court : आई वडील IAS असल्यास मुलांना OBC आरक्षणाचा लाभ का ? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयरची मर्यादा या विषयावर सर्वोच्च न्यायालयात एक सुनावणी सुरू होती. या

Jhalmuri Shopkeeper : पंतप्रधानांना झालमुरी खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला पाक-बांगलादेशातून धमक्या; कुटुंब दहशतीखाली

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झालमुरी खाऊ घातल्यानंतर चर्चेत

Delhi Riots Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिदला दिलासा! आईच्या शस्त्रक्रियेसाठी ३ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : उमर खालिद (Umar Khalid) याला दिल्ली उच्च न्यायालय (Delhi High Court) कडून मोठा दिलासा मिळाला आहे. २०२०मधील उत्तर-पूर्व

Mount Everest Indian Climbers : एव्हरेस्ट सर केला, पण परतीचा प्रवास ठरला अखेरचा! दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) वर यशस्वी चढाई केल्यानंतर परतीच्या प्रवासात दोन भारतीय

गिधाडांना घरी बसवणारी जनता देशभक्तीच्या ‘हिट’ने झुरळांचाही बंदोबस्त करेल

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला कॉक्रोच जनता पार्टीला सरकार घाबरल्याचा दावा