‘सेंट्रल व्हिस्टा’तून दरवर्षी एक हजार कोटी वाचणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची विविध कार्यालये आहेत. ते एकाच ठिकाणी नाही. त्यासाठी त्याचे भाडे, वाहतूक व्यवस्था, कर्मचारी, अधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवनात केंद्र सरकारची सर्व कार्यालये एकाच छत्राखाली येणार आहेत. येत्या २८ मे रोजी या नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत या नव्या भवनामुळे सरकारी तिजोरीतील दरवर्षी एक हजार कोटी वाचणार आहेत,असा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.



एका अहवालानुसार या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एकूण खर्च हा २५ हजार कोटी रुपये येणार आहे. यात एक हजार कोटी रुपये नवीन संसद भवन निर्माण करण्यासाठी लागले आहेत. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.



कोरोना काळात सुरू असलेल्या या प्रकल्पाचा कामावर विरोधकांनी टीका केली होती. मात्र देशासाठी हा प्रकल्प किती उपयुक्त आहे, असा दावा करीत मोदी सरकारने याचे काम सुरूच ठेवले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार असला तरी हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.