‘सेंट्रल व्हिस्टा’तून दरवर्षी एक हजार कोटी वाचणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची विविध कार्यालये आहेत. ते एकाच ठिकाणी नाही. त्यासाठी त्याचे भाडे, वाहतूक व्यवस्था, कर्मचारी, अधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवनात केंद्र सरकारची सर्व कार्यालये एकाच छत्राखाली येणार आहेत. येत्या २८ मे रोजी या नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत या नव्या भवनामुळे सरकारी तिजोरीतील दरवर्षी एक हजार कोटी वाचणार आहेत,असा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.



एका अहवालानुसार या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एकूण खर्च हा २५ हजार कोटी रुपये येणार आहे. यात एक हजार कोटी रुपये नवीन संसद भवन निर्माण करण्यासाठी लागले आहेत. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.



कोरोना काळात सुरू असलेल्या या प्रकल्पाचा कामावर विरोधकांनी टीका केली होती. मात्र देशासाठी हा प्रकल्प किती उपयुक्त आहे, असा दावा करीत मोदी सरकारने याचे काम सुरूच ठेवले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार असला तरी हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे