ज्येष्ठ समाजवादी नेते रविंद्र वैद्य यांचे निधन

जव्हार : ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल गुरुवार, २५ मे रोजी त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे सुपुत्र संदीप (जव्हारचे माजी नगराध्यक्ष) यांनी त्यांना जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात दाखल केले. परंतु मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, मुलगा संदीप, सून, नातवंडे असा परिवार आहे.


प्रजा समाजवादी पक्ष सुरु करुन आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. दत्ता ताम्हाणे यांच्या प्रेरणेतून जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी भागात आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. गोवा व दमण मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता.


साप्ताहिक आहुती बरोबरच मुंबई येथील नवशक्ती दैनिकाचे बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. राजकारणाबरोबरच मराठी पत्रकारितेत त्यांनी आपला ठसा उमटविला होता. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला होता.


१९९७ साली त्यांच्या पत्नी सौ. नीला यांचे निधन झाले. त्यानंतर रवींद्र वैद्य यांची प्रकृती ढासळत होती. यातूनही गेल्या आठवड्यात ते एका कार्यक्रमासाठी मुंबई येथे आले होते. मात्र काल फारच प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले व तिथेच त्यांचे निधन झाले.

Comments
Add Comment

Sachin Ahir : सचिन अहिर यांच्या मुंबईतील घरात मोठी चोरी; 2.65 कोटींचा ऐवज लंपास, घरातील कर्मचाऱ्यावर संशय

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास होणार हायटेक! लाईन ३ वर स्मार्ट तिकीट व्यवस्था सुरू

पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) लाईन ३ (Line 3) वर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक

Pune Wethear : पुण्यात पावसाचा जोर कायम; शहराला ऑरेंज, घाटमाथ्याला रेड अलर्ट

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवसही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची

Ashadhi Wari : आषाढी वारीत 'संवाद वारी'द्वारे रोजगार हमी योजनेची जनजागृती; मंत्री भरत गोगावले यांचा सहभाग

पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या व्ही.बी.जी. रामजी – विकसित भारत

Maharashtra weather : पुढचे काही तास धोक्याचे! 70 च्या वेगाने वारे आणि अतिमुसळधार पाऊस; 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

14 जिल्ह्यांकडे पावसाने फिरवली पाठ! महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असला तरी राज्यात दोन वेगवेगळी चित्रे पाहायला

Babasaheb Patil : ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना उद्या कर्जमाफीचा लाभ मिळणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेधारकांची यादी जाहीर होणार मुंबई (Mumbai):