ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.९३ टक्के

मुलांची निकालात बाजी तर मुलींचा टक्का वाढला


ठाणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२३ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार तयार करण्यात आलेला इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९१.२५ टक्के लागला असून यंदा कोकणचा निकाल ९६.०१ टक्के तर ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे.


दरम्यान, गेल्यावर्षी बारावीचा निकाल ९२.६७ टक्के लागला होता. मात्र यंदा निकालात काही अंशी वाढ झाली असून मुलांनी निकालात बाजी मारली असली तरी मुलींचा टक्का जास्त आहे. मुलांमध्ये १८४४१ पैकी १७००५ मुले पास झाली असून मुलींमध्ये १५५४२ पैकी १४४९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच मुलींचा टक्का ९३.४९ तर ९२.४२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. दरम्यान, कोकण विभागात पालघर जिल्ह्याचा उच्चांकी निकाल लागला असून पालघर ९३.१२ टक्के तर रायगडचा निकाल ९५.५६ टक्के निकाल लागला आहे.


मार्च - एप्रिल २०२२ चा निकाल ९४.२२ टक्के इतका होता. फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ९१.२५ टक्के आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल २०२२ च्या तुलनेत या वर्षी निकाल २.९७ टक्के कमी आहे. तथापि फेब्रुवारी-मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ०.५९ टक्के वाढला आहे.



ठाणे जिल्ह्यात ३१ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण


ठाणे जिल्ह्यातील ३३९८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३१ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी १४४९४ मुली तर १७००५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. अशाप्रकारे मुलांचा ९२.४६ टक्के निकाल लागला तर मुलींचा ९३.४९ टक्के लागला आहे.



मुरबाड अव्वल


ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण ग्रामीण, कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये मुरबाडचा निकाल ९७.१ टक्के लागला असून सर्वात निच्चांकी निकाल उल्हासनगर ८६.५२ टक्के लागला आहे.


कल्याण ग्रामीण ९१.६९, बदलापूर-अंबरनाथ ८६.७४, भिवंडी ८७.३०, भिवंडी शहर ९०.३, मुरबाड ९७.१, शहापूर ९०.५५, ठाणे शहर ९०.७४, नवी मुंबई ९०.६४, मिरा-भाईंदर ९२.२६, कल्याण-डोंबिवली ८७.६५, उल्हासनगर ८६.५२, रायगड विभागात पनवेल ९६.९४, उरण ९३.८८, कर्जत ८६.५५, खालापूर ८३.४२ पेण ९०.४०,अलिबाग ९१.३४, मुरूड ९१.९७, रोहा ९३.१६, सुधागड ८२.३६, तळा ९५.२५, श्रीवर्धन ९४.८९, म्हसळा ९४.८६, महाड ८७.३०, पोलादपूर ८८.१७ टक्के निकाल लागला आहे. पालघर जिल्ह्यात वाडा ८६.५१, मोखाडा ९४.४०, विक्रमगड ८७.४५, जव्हार ७०.४५, तलासरी ८९.५१, डहाणू ८५.२१, पालघर ९०.३८, वसई-विरार ९३.७० असा निकाल जाहीर झाला आहे.

Comments
Add Comment

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू