ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.९३ टक्के

  143

मुलांची निकालात बाजी तर मुलींचा टक्का वाढला


ठाणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२३ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार तयार करण्यात आलेला इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९१.२५ टक्के लागला असून यंदा कोकणचा निकाल ९६.०१ टक्के तर ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे.


दरम्यान, गेल्यावर्षी बारावीचा निकाल ९२.६७ टक्के लागला होता. मात्र यंदा निकालात काही अंशी वाढ झाली असून मुलांनी निकालात बाजी मारली असली तरी मुलींचा टक्का जास्त आहे. मुलांमध्ये १८४४१ पैकी १७००५ मुले पास झाली असून मुलींमध्ये १५५४२ पैकी १४४९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच मुलींचा टक्का ९३.४९ तर ९२.४२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. दरम्यान, कोकण विभागात पालघर जिल्ह्याचा उच्चांकी निकाल लागला असून पालघर ९३.१२ टक्के तर रायगडचा निकाल ९५.५६ टक्के निकाल लागला आहे.


मार्च - एप्रिल २०२२ चा निकाल ९४.२२ टक्के इतका होता. फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ९१.२५ टक्के आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल २०२२ च्या तुलनेत या वर्षी निकाल २.९७ टक्के कमी आहे. तथापि फेब्रुवारी-मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ०.५९ टक्के वाढला आहे.



ठाणे जिल्ह्यात ३१ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण


ठाणे जिल्ह्यातील ३३९८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३१ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी १४४९४ मुली तर १७००५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. अशाप्रकारे मुलांचा ९२.४६ टक्के निकाल लागला तर मुलींचा ९३.४९ टक्के लागला आहे.



मुरबाड अव्वल


ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण ग्रामीण, कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये मुरबाडचा निकाल ९७.१ टक्के लागला असून सर्वात निच्चांकी निकाल उल्हासनगर ८६.५२ टक्के लागला आहे.


कल्याण ग्रामीण ९१.६९, बदलापूर-अंबरनाथ ८६.७४, भिवंडी ८७.३०, भिवंडी शहर ९०.३, मुरबाड ९७.१, शहापूर ९०.५५, ठाणे शहर ९०.७४, नवी मुंबई ९०.६४, मिरा-भाईंदर ९२.२६, कल्याण-डोंबिवली ८७.६५, उल्हासनगर ८६.५२, रायगड विभागात पनवेल ९६.९४, उरण ९३.८८, कर्जत ८६.५५, खालापूर ८३.४२ पेण ९०.४०,अलिबाग ९१.३४, मुरूड ९१.९७, रोहा ९३.१६, सुधागड ८२.३६, तळा ९५.२५, श्रीवर्धन ९४.८९, म्हसळा ९४.८६, महाड ८७.३०, पोलादपूर ८८.१७ टक्के निकाल लागला आहे. पालघर जिल्ह्यात वाडा ८६.५१, मोखाडा ९४.४०, विक्रमगड ८७.४५, जव्हार ७०.४५, तलासरी ८९.५१, डहाणू ८५.२१, पालघर ९०.३८, वसई-विरार ९३.७० असा निकाल जाहीर झाला आहे.

Comments
Add Comment

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

Israel-Hamas: इस्रायली सैन्याचे गाझावर हवाई हल्ले! संघर्ष पुन्हा पेटला

हमासच्या नौदल कमांडरसह तीन सैनिक ठार इस्रायल सैन्याने (आयडीएफ)  पुन्हा गाझा येथे हवाई हल्ला करत हमासच्या नौदल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

हृदयद्रावक घटना: व्यायामादरम्यान 15 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रवीण धायगुडे (वय १५)

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात