देशात भाजप राबविणार महिनाभर जनसंपर्क अभियान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : केंद्रातील मोदी सरकारला २६ मे रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपने महिनाभरापासून देशभर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीत देशभरात सुमारे ५० रॅली काढण्याची योजना आखली आहे. या सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अनेक भापचे बडे नेते सभांना संबोधित करणार आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० मे २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामुळे भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही चालना मिळणार आहे. ३१ मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ यांच्यासोबतच इतर केंद्रीय मंत्री आणि नेतेही या जनसंपर्क अभियानाचा भाग असणार आहेत. दरम्यान, २७ मे रोजी जे. पी. नड्डा पत्रकार परिषदेत मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामांबद्दल सांगणार आहेत. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने केंद्राच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्याची सुरुवात ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या रॅलीने होणार आहे. ३० मे ते ३० जून या कालावधीत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत पक्षातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा

West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर

भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस

Chhattisgarh Accident : छत्तीसगड हादरलं! लग्नावरून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ३ गंभीर जखमी

छत्तीसगडमधील कांकेर (Chhattisgarh Accident) जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारही तेजीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांतता चर्चा पुन्हा मार्गी लागल्याच्या बातमीने बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे