देशात भाजप राबविणार महिनाभर जनसंपर्क अभियान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : केंद्रातील मोदी सरकारला २६ मे रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपने महिनाभरापासून देशभर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीत देशभरात सुमारे ५० रॅली काढण्याची योजना आखली आहे. या सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अनेक भापचे बडे नेते सभांना संबोधित करणार आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० मे २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामुळे भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही चालना मिळणार आहे. ३१ मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ यांच्यासोबतच इतर केंद्रीय मंत्री आणि नेतेही या जनसंपर्क अभियानाचा भाग असणार आहेत. दरम्यान, २७ मे रोजी जे. पी. नड्डा पत्रकार परिषदेत मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामांबद्दल सांगणार आहेत. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने केंद्राच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्याची सुरुवात ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या रॅलीने होणार आहे. ३० मे ते ३० जून या कालावधीत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत पक्षातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला