संजय राऊत जेलमध्ये होते तेव्हा राज्यात शांतता होती

पुणे: संजय राऊत जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा राज्यात शांतता जाणवत होती. संजय राऊत तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आता उन्हाळा सुरू आहे. म्हणून त्यांना परत सरकारी विश्रांतीची गरज आहे असे मला वाटत आहे. त्यामुळे आमच्या समर्थकांच्या भावना दुखवतील अशी विधाने तुम्ही करू नका, असा इशारा शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना दिला.


आजच्या सामनाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून भाष्य करण्यात आले आहे. त्यावर शंभुराज देसाई यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामनाच्या अग्रलेखाला एक दर्जा होता. मात्र संजय राऊत जेव्हापासून लिहायला लागलेत तेव्हापासून तो दर्जा राहिला नाही. मी आजचा अग्रलेख वाचला नाही. संजय राऊत आता जयंत पाटलाचे प्रवक्ते झाले आहेत. भाकरी ठाकरेंची खातात, मात्र चाकरी शरद पवारांची करतात. ते विश्वप्रवक्ते झाले आहेत. जयंत पाटील कधीही माझ्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव आल्याबद्दल बोलले नाहीत. मग संजय राऊतांना ते स्वप्न पडले होते का? असा सवालच शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या