धरण उशाला, कोरड घशाला!

नवीन पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यात तब्बल २२ लाख ९४ हजार निधीचा वापर करून बांधलेल्या जलयुक्त शिवारात पाण्याचा एक थेंब देखील शिल्लक नाही. यातील पाणी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच आटल्यामुळे आदिवासी बांधवाना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परिणामी आजूबाजूच्या आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे.



तालुक्यातील धोदाणी येथे २६ जानेवारी २०१५ रोजी पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते जलशिवार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर काम पूर्ण करण्यात आले. मालडुंगे, धोदाणी, धामणी, देहरंग, आदी गाव परिसरात उन्हाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. माथेरानच्या डोंगरावरून वाहून येणारे पाणी गाढी नदीतून खाडीला जाऊन मिळते.



पाणी जिरत नसल्याने बहुतांशी गावात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होते. यावर मात करण्यासाठी जवळपास २३ लाख रुपये खर्च करून जलयुक्त शिवार बांधण्यात आले. या जलयुक्त शिवारात पावसाळा संपल्यावर पाणीच शिल्लक राहत नसल्याचे येथील आदिवासी बांधवांनी सांगितले. जलयुक्त अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील धोदाणी परिसरात पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याच्या कामाला २०१५ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. मात्र यातील पाणी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच आटल्यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबलेली नाही.


पाण्यासाठी वणवण; फार्म हाऊसना मात्र मिळते पाणी!
महिलांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते. पुरुष व महिला दोघांनाही मोलमजुरीवर पाणी सोडून पाण्यासाठी वणवण करावी लागते. पनवेल शहर, नवीन पनवेलला पाण्याचा पुरवठा करणारे देहरंग धरण ज्या हद्दीत आहे, त्या हद्दीतील वाड्यांना या धरणाचे पाणी चाखायला देखील मिळत नाही.


Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक