महिला सन्मान योजनेतून एसटीला ९ कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी (प्रतिनिधी): संपूर्ण राज्यात दि. १७ मार्चपासून सरकारने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत ‘महिला सन्मान योजना’ म्हणून जाहीर केली. या योजनेमुळे आता महाराष्ट्रात सगळीकडेच एस.टी.ने प्रवास करणाऱ्यांची संख्या १० ते २० पटीत वाढली आहे. परिणामी रत्नागिरी एसटी विभागाचे उत्पन्न भरघोस वाढले आहे. तीन महिन्यात ४६ लाख ३६९३ महिला प्रवाशांनी एसटी ने प्रवास केला असून यातून तब्बल ९ कोटी ३२ लाख ४६ हजार २५२ इतके उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.



राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान योजना’ घोषित करून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला.



या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली आहे. त्याच दिवसापासून महिला प्रवाशांची ‘एसटी’त गर्दी वाढली आहे. अर्थात आता बसमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांचीच गर्दी अधिक पाहावयास मिळत आहे. एसटीत चढण्यासाठी महिलांची सगळीकडे चढाओढ दिसून येत आहे, एकीकडे कोरोना काळानंतर एसटी बॅकफूट वर आली होती, कर्जाच्या बोज्याखाली एसटी महामंडळ मार्गक्रमण करत होती, मात्र मार्च २०२३ मध्ये ही योजना लागू केल्या नंतर आता बस मध्ये जागा मिळवण्यासाठी महिलांची बाचाबाची सुद्दा होत असल्याच्या घटना सध्या घडत आहेत. त्यातच आता थेट खिडकीतून जागा पकडण्यासाठी कसरती महिला प्रवाशी करू लागल्या आहेत. रत्नागिरी एसटी विभागाला महिला प्रवाशांमुळे तब्बल ९ कोटी ३२ लाख ४६ हजार इतके उत्पन्न १६ मेपर्यंत प्राप्त झाले आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य