चुकीच्या उपचारामुळे अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप



नांदेड : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका अठरा वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे हा मृत्यू ओढवला, असा आरोप केला आहे. जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. मुलीच्या मृत्यूला ३ दिवस उलटले तरीही नातेवाईकांनी या कारणास्तव मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.


मृत तरुणी अठरा वर्षीय विद्यार्थिनी होती. १८ मे ला तिला चक्कर आल्यामुळे शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच तिचा मृत्यू झाला.


दरम्यान गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली. "नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संबंधित डॉक्टर व स्टाफकडून जो निष्काळजीपणा झाला असेल त्यावर समिती स्थापन करुन कोणी दोषी आढळल्यास त्यावर निश्चित योग्य ती कारवाई केली जाईल", असं जिल्हाधिकारी म्हणाले.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी