चुकीच्या उपचारामुळे अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

  123

चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप



नांदेड : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका अठरा वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे हा मृत्यू ओढवला, असा आरोप केला आहे. जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. मुलीच्या मृत्यूला ३ दिवस उलटले तरीही नातेवाईकांनी या कारणास्तव मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.


मृत तरुणी अठरा वर्षीय विद्यार्थिनी होती. १८ मे ला तिला चक्कर आल्यामुळे शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच तिचा मृत्यू झाला.


दरम्यान गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली. "नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संबंधित डॉक्टर व स्टाफकडून जो निष्काळजीपणा झाला असेल त्यावर समिती स्थापन करुन कोणी दोषी आढळल्यास त्यावर निश्चित योग्य ती कारवाई केली जाईल", असं जिल्हाधिकारी म्हणाले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis: आंदोलनासंबंधीचा तोडगा लवकरच निघेल पण त्यासाठी संवाद गरजेचा - मुख्यमंत्री

पुणे: आंदोलनासंबंधीचा तोडगा लवकरच निघेल, पण त्यासाठी संवादाची गरज आहे. आंदोलनातून मराठा समाजाच्या हिताचे निर्णय

Weather Update : पावसाची धडाकेबाज एंट्री! कोकण-घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भात सतर्कतेचा इशारा, IMD ने दिली माहिती...

मुंबई : यंदाचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रासह देशासाठी पावसाळी ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर हा पाऊस

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी