दशक्रिया विधीसाठी गंगा घाटावर आले आणि...

बलिया : गंगेसारख्या पवित्र ठिकाणी अनेक धार्मिक विधी केले जातात. सोमवारी सकाळीदेखील दशक्रिया विधीसाठी लोक गंगा नदीच्या माल्देपूर घाटाजवळ आले होते. मात्र विधी उरकून परतताना अनपेक्षितपणे मोठी दुर्घटना घडली. या प्रवाशांना घेऊन जाणारी नाव अचानक पाण्यात उलटल्याने अपघात झाला.



उत्तर प्रदेशच्या बलिया येथे पेफना पोलीस ठाणे परीक्षेत्रातील माल्देपूर घाटाजवळ ही दुर्घटना घडली. एका बोटमधून ४० जण प्रवास करत होते. त्यामध्ये, ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्दैवाने अद्याप किती जण बेपत्ता झाले आणि बुडाले आहेत याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. त्या लोकांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.



नाव उलटल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. काहींना स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढले, तर ज्यांना पोहायला येत होते, तेही स्वत;हून बाहेर आल्याने बचावले. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

India's space sector : भारताच्या खासगी स्पेस क्षेत्राची मोठी झेप; 800 kN क्षमतेचे ‘एव्हरेस्ट’ रॉकेट इंजिन लॉन्च

देशाच्या खासगी अंतराळ क्षेत्राने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. बंगळुरूस्थित एस्ट्रोबेस स्पेस

India - Pak Border : भारत-पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला! BSFच्या गोळीबारात संशयित ठार; पंजाबमध्ये सुरक्षा वाढवली

पंजाब : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (BSF) उधळून लावला. पंजाबमधील

Varanasi Ganga Aarti : वाराणसीत गंगेचा रौद्ररूप! दशाश्वमेध घाटावरील प्रसिद्ध गंगा आरतीची जागाच बदलली

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा नदीच्या वाढत्या जलस्तराचा परिणाम आता धार्मिक कार्यक्रमांवरही होत

India-America Relation : भारत-अमेरिका संबंधांना नवी दिशा! अमेरिकेच्या उपाध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे

Uday Samant : मराठी चित्रपटांतून संस्कृतीला जागतिक व्यासपीठ, मराठी भाषा मंत्री उदय सामंत; दिल्लीतील महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली : मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण

Bastar : बस्तरच्या ९२ गावांत प्रथमच तिरंगा, नक्षली दहशतीच्या सावटातून राष्ट्रीय प्रवाहाकडे वाटचाल

रायपूर : नक्षलवादाच्या दहशतीमुळे गेली अनेक दशके स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापासून दूर राहिलेल्या