गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आयटी इंजिनीअर दाम्पत्याचा नवा उपक्रम

नांदेड : पोटापाण्यासाठी अनेक तरुण मुंबई-पुण्यासारख्या शहरात आठ ते बारा तासांची नोकरी करताना आपल्याला दिसतात. पण काम पोटासाठीचं असलं तरी ते आवडीचं असावं लागतं अन्यथा त्याचा कामावर परिणाम होतो. म्हणूनच की काय आपली आवड जपत एका आयटी इंजिनीअर दाम्पत्याने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेवग्याच्या पाल्यापासून नवीन आणि वेगळा उपक्रम सुरु केला आहे. यातून मिळणारं उत्पन्न आयटी पगाराच्या बरोबरीचं नसलं तरी मिळणारं आत्मिक समाधान पराकोटीचं आहे. मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.

मूळ नांदेड येथील पावडेवाडीचे ते रहिवासी आहेत. पुणे-मुंबईसारख्या मेट्रो शहरात आयटी इंजिनीअर असलेल्या या दाम्पत्याने १५ वर्षे नोकरी केली. महिन्याकाठी दोघांना मिळून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये पगार मिळत होता. परंतु शेतीच्या माध्यमातून वेगळा व्यवसाय सुरु करण्याच्या त्यांच्या स्वप्नामुळे त्यांना पैशाची भुरळ पडली नाही.

यासाठी त्यांनी हैदराबाद येथे वास्तव्यास असताना शेतीविषयक माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी शेवग्याच्या शेंगांची लागवड करायचे ठरवले. शेवग्याचे औषधी गुणधर्म, फायदे या सगळ्याची माहिती घेऊन ते आपल्या गावी परतले. तिथे त्यांनी शेवग्याची शेती सुरु केली मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून या दाम्पत्याने या शेतीतूनच संशोधनकार्य सुरु केले आणि त्यातून मोरिंग्या पावडरची निर्मिती केली.

ही पावडर मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचं त्यांनी सांगितलं. ही पावडर ते प्रतिकिलो एक हजार रुपये या दराने विकतात. डॉक्टर आणि अनेक व्यावसायिकांकडून या पावडरला प्रचंड मागणी आहे. पावडे जोडपं यातून महिन्याकाठी जवळपास दीड लाख रुपये कमावतं. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारा हा व्यवसाय मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे यशस्वीरित्या सांभाळत आहेत.

पावडर तयार करण्याची प्रक्रिया

शेवग्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर तीन महिन्यानंतर पाला उपलब्ध होतो. त्यानंतर पाला तोडून, तो एकत्र करुन भिजत घालतात. निर्जंतुकीकरण करण्यासाठी लिंबाची पानं आणि मीठ देखील योग्य प्रमाणात टाकलं जातं. त्यानंतर दोन ते तीन दिवस पाला सुकण्यासाठी ठेवला जातो. पाला पूर्ण सुकल्यानंतर मशीनमधून बारीक करुन पावडर तयार केली जाते. त्यानंतर पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलोप्रमाणे पॅकिंग करुन ऑर्डरप्रमाणे विक्री केली जाते.
Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध