गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आयटी इंजिनीअर दाम्पत्याचा नवा उपक्रम

नांदेड : पोटापाण्यासाठी अनेक तरुण मुंबई-पुण्यासारख्या शहरात आठ ते बारा तासांची नोकरी करताना आपल्याला दिसतात. पण काम पोटासाठीचं असलं तरी ते आवडीचं असावं लागतं अन्यथा त्याचा कामावर परिणाम होतो. म्हणूनच की काय आपली आवड जपत एका आयटी इंजिनीअर दाम्पत्याने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेवग्याच्या पाल्यापासून नवीन आणि वेगळा उपक्रम सुरु केला आहे. यातून मिळणारं उत्पन्न आयटी पगाराच्या बरोबरीचं नसलं तरी मिळणारं आत्मिक समाधान पराकोटीचं आहे. मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.

मूळ नांदेड येथील पावडेवाडीचे ते रहिवासी आहेत. पुणे-मुंबईसारख्या मेट्रो शहरात आयटी इंजिनीअर असलेल्या या दाम्पत्याने १५ वर्षे नोकरी केली. महिन्याकाठी दोघांना मिळून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये पगार मिळत होता. परंतु शेतीच्या माध्यमातून वेगळा व्यवसाय सुरु करण्याच्या त्यांच्या स्वप्नामुळे त्यांना पैशाची भुरळ पडली नाही.

यासाठी त्यांनी हैदराबाद येथे वास्तव्यास असताना शेतीविषयक माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी शेवग्याच्या शेंगांची लागवड करायचे ठरवले. शेवग्याचे औषधी गुणधर्म, फायदे या सगळ्याची माहिती घेऊन ते आपल्या गावी परतले. तिथे त्यांनी शेवग्याची शेती सुरु केली मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून या दाम्पत्याने या शेतीतूनच संशोधनकार्य सुरु केले आणि त्यातून मोरिंग्या पावडरची निर्मिती केली.

ही पावडर मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचं त्यांनी सांगितलं. ही पावडर ते प्रतिकिलो एक हजार रुपये या दराने विकतात. डॉक्टर आणि अनेक व्यावसायिकांकडून या पावडरला प्रचंड मागणी आहे. पावडे जोडपं यातून महिन्याकाठी जवळपास दीड लाख रुपये कमावतं. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारा हा व्यवसाय मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे यशस्वीरित्या सांभाळत आहेत.

पावडर तयार करण्याची प्रक्रिया

शेवग्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर तीन महिन्यानंतर पाला उपलब्ध होतो. त्यानंतर पाला तोडून, तो एकत्र करुन भिजत घालतात. निर्जंतुकीकरण करण्यासाठी लिंबाची पानं आणि मीठ देखील योग्य प्रमाणात टाकलं जातं. त्यानंतर दोन ते तीन दिवस पाला सुकण्यासाठी ठेवला जातो. पाला पूर्ण सुकल्यानंतर मशीनमधून बारीक करुन पावडर तयार केली जाते. त्यानंतर पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलोप्रमाणे पॅकिंग करुन ऑर्डरप्रमाणे विक्री केली जाते.
Comments
Add Comment

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना