बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उचललं 'हे' पाऊल

नवी दिल्ली : निवडणुकीदरम्यान अनेकदा बोगस मतदान होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि निपक्षपातीपणे मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सध्या त्याबाबत चाचपणी सुरु आहे. याची अंमलबजावणी यंदा होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून होण्याची शक्यता आहे.


निवडणूक आयोग यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. यात मतदानानंतर मतदाराच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी लेझरची खूण करण्यात येईल. ही खूण अनेक दिवस तशीच राहील, ती हटवणे शक्य होणार नाही. त्यामुळे व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास पकडला जाईल.


त्याचबरोबर ईव्हीएम मशीनला एक कॅमेरा लावण्यात येईल, ज्यात मतदानादरम्यान मतदाराचा फोटो काढला जाईल. एखादा व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास हा कॅमेरा त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याबद्दलचा अलर्ट अधिकार्‍यास पाठवेल.


या दोन्ही गोष्टींचे सध्या परीक्षण सुरु आहे. लवकरच त्या लागू करण्यात येतील आणि त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो.

Comments
Add Comment

Resident Doctors Strike High Court Verdict : "काम नसेल तर पगार..."; संपावर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका!

मुंबई : होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (MMC) सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या

Phuket delhi air india flight Turbulence : हवेत अचानक लागला भीषण झटका अन् प्रवासी थेट छतावर आदळले! एअर इंडियाच्या विमानात ताणतणाव आणि किंचाळ्या; १७ जण जखमी

नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना "सीटबेल्ट बांधा" अशी सूचना मिळणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, मंगळवारी

Tarun Tejpal : मोठी बातमी! 'तहलका'चे संस्थापक तरुण तेजपाल यांना १० वर्षांचा तुरुंगवास

२०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! पणजी : प्रसिद्ध 'तहलका' मासिकाचे संस्थापक तरुण

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय