यशस्वी, रिंकू आणि तिलक भारतीय संघाचे दावेदार

रवी शास्त्री यांचे मत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात तीन खेळाडूंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून त्यांना भारतीय संघात संधी मिळावी असा सूर चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. भारताचा माजी प्रशिक्षकही या खेळाडूंच्या कामगिरीने प्रभावित झाला आहे. यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह आणि तिलक वर्मा या युवा खेळाडूंचा दमदार फॉर्म पाहता हे खेळाडू विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठीही दावेदार असल्याचे मत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.


यंदाचा आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटूही नव्या खेळाडूंना पाहून प्रभावित झाले आहेत. यंदाच्या हंगामात ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, रिंक सिंह, तिलक वर्मा, नेहाल वधेरा यासारख्या अनेक तरुण खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना आणि सुयश शर्मा यांसारख्या युवा खेळाडूंच्या गोलंदाजीचाही कहर पाहायला मिळाला.

Comments
Add Comment

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया पुढील मालिका कुठे खेळणार ?

कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी