नमन, जाखडी लोककलांना मिळणार राजाश्रय

चिपळूण (प्रतिनिधी) : आमदार शेखर निकम यांनी कोकणातील नमन व जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर आता नमन, जाखडी लोककलांना राजाश्रय मिळण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यात गांभीर्याने लक्ष घतले असून लवकर याबाबत बैठक घेऊन हा महत्त्वाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.



कोकणातील दशावतार वगळता नमन, जाखडी अशा महत्त्वाच्या लोककलांना राजाश्रय नाही. यामुळे नमन, जाखडी अशी अनेक मंडळे आज लोकांचे मनोरंजन करीत असताना, कोकणातील या लोककला अनेक कलाकार जपत असताना त्यांची अडचण होत आहे. नमन, जाखडी मंडळांना अनुदान मिळत नाही, कलाकारांना कसल्याही प्रकारच्या सुविधा अथवा मानधन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी चिपळूण येथे झालेल्या लोककला महोत्सवात नमन, जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हा कोकणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय पावसाळी अधिवेशनात मांडला. त्याला आता मूर्त रूप येण्याची चिन्हे दिसत आहेत.



सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी आ. शेखर निकम यांना १५ मे रोजीच्या पत्राने या विषायासंदर्भात उत्तर दिले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव यांच्याकडे आपण हा विषय कार्यवाहीसाठी पाठविल्याचे मुनगंटीवार यांनी कळविले आहे. तसेच या संदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचे जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची