डॉ. विजया वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

Share

मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी-पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या हस्ते डॉ. विजया वाड यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पहिले शिव, बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आदिशक्ती संत मुक्ताईनगरीत मोठ्या थाटात संपन्न झाले. या प्रसंगी डॉ. विजया वाड यांना त्यांच्या तब्येतीमुळे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र आणि डॉ. उज्जैनकर यांनी संपादित केलेले प्रबोधनाची ज्ञानदिंडी हे पुस्तक भेट देऊन हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी प्रास्ताविकामध्ये फाउंडेशनच्या राज्य संघटक पूनम राणे यांनी प्रास्ताविक करून डॉ. विजया वाड यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तर डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी फाउंडेशनचे कार्य विशद करून विजया वाड यांच्या कार्याचीसुद्धा उपस्थितांना माहिती दिली.

या प्रसंगी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य प्रा. विनायक वाडेकर, राज्य संपर्कप्रमुख फर्जना डांगे, राज्य समन्वयक लता गुंठे, राज्य महिला संघटक पूनम राणे, ठाणे जिल्हा समन्वयक रमेश उज्जैनकर, जळगाव जिल्हा सल्लागार मनोहर रोकडे, बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. निवृत्ती जाधव, आर्यन वाडेकर यांची विशेष उपस्थिती होती.

Recent Posts

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

49 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…

1 hour ago

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

2 hours ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामीच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

2 hours ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

2 hours ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

3 hours ago