डॉ. विजया वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

  196

मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी-पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या हस्ते डॉ. विजया वाड यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पहिले शिव, बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आदिशक्ती संत मुक्ताईनगरीत मोठ्या थाटात संपन्न झाले. या प्रसंगी डॉ. विजया वाड यांना त्यांच्या तब्येतीमुळे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र आणि डॉ. उज्जैनकर यांनी संपादित केलेले प्रबोधनाची ज्ञानदिंडी हे पुस्तक भेट देऊन हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.


या प्रसंगी प्रास्ताविकामध्ये फाउंडेशनच्या राज्य संघटक पूनम राणे यांनी प्रास्ताविक करून डॉ. विजया वाड यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तर डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी फाउंडेशनचे कार्य विशद करून विजया वाड यांच्या कार्याचीसुद्धा उपस्थितांना माहिती दिली.


या प्रसंगी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य प्रा. विनायक वाडेकर, राज्य संपर्कप्रमुख फर्जना डांगे, राज्य समन्वयक लता गुंठे, राज्य महिला संघटक पूनम राणे, ठाणे जिल्हा समन्वयक रमेश उज्जैनकर, जळगाव जिल्हा सल्लागार मनोहर रोकडे, बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. निवृत्ती जाधव, आर्यन वाडेकर यांची विशेष उपस्थिती होती.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री