कोकण रेल्वे आरक्षणात दलालांचे वर्चस्व; तक्रारी करुनही रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

मुंबई : कोकणातला गणेशोत्सव म्हटला की मुंबईतील चाकरमान्याला आपल्या गावी जायचे वेध लागतात. यंदाची गणेशचतुर्थी १९ सप्टेंबरला असून १६ मे पासून कोकण रेल्वेच्या आरक्षणाला सुरुवात करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे आरक्षण सुरु झाल्याच्या दुस-याच दिवशी आरक्षण फुल्ल झालं आहे. १२० दिवस आधीच आरक्षण फुल्ल झाल्यामुळे अनेक प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


अवघ्या पाच मिनिटात बुकिंग फुल्ल झाल्याने यात काळाबाजार होत असल्याची माहिती मिळत आहे. चाकरमानी गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी काहीही करु शकतो, याची संबंधित दलालांना माहिती असल्याने त्यांनी तिकीट आरक्षणात काळाबाजार केल्याचे समजत आहे. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या असून रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने चाकरमान्यांकडून अधिकच नाराजी व्यक्त केली जात आहे.


दरम्यान काही प्रवासी प्रतिक्षा यादीत तिकीट काढत आहेत, परंतु प्रतिक्षा यादीही ३०० ते ४०० च्या घरात पोहोचली आहे. तर काही गाड्यांची प्रतिक्षा यादीच संपली आहे. कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस दुसऱ्याच दिवशी हाऊसफुल झाल्या आहेत.


गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरता दरवर्षी खासगी वाहने, एसटी, खासगी बसेसप्रमाणेच मेल एक्स्प्रेस गाड्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी असते. त्यातच रेल्वे प्रवासास सर्वाधिक पसंती दिली जाते. दादर, वसई, ठाणे आणि पनवेल आदी स्थानकातून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्या प्रत्येक वर्षी भरभरून जात असतात. मात्र सामान्यांच्या खिशाला परवडणारी ही कोकण रेल्वे चार महिने आधीच फुल्ल झाली आहे.



Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार