अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २५ मे पासून सुरु

मुंबई : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. २५ मेपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु होईल तर निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.



२५ मे पासून सकाळी ११ वाजल्यापासून ते दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. तर निकालानंतर अर्जाचा भाग दोन भरण्यास वेळ दिला जाणार आहे. यात विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे पसंती क्रमांक देऊन इतर माहिती भरावी लागणार आहे.


सीबीएसई बोर्डाचा निकाल १२ मे रोजी तर आयसीएसई बोर्डाचा निकाल १४ मे रोजी जाहीर झाला. एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल मात्र अजून प्रतिक्षेत आहे आणि त्याआधीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तयारी करावी लागणार आहे. राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी आणि तिसरी फेरी व त्यासोबतच विशेष फेरीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येईल.

Comments
Add Comment

Ritu Tawde : लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ भाजप नगरसेवकांनी पकडला गॅस सिलेंडर आणि गुटख्याचा अवैध साठा

महापौराने दिले कारवाईचे सक्त आदेश मुंबई ; लोकमान्य टिळक टर्मिनस (एल टी टी ) जवळील स्वराज चौकात शनिवारी २० जून २०२६

PM Kisan : राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब

ST bus : ४० वारकरी एकत्र आल्यास थेट गावातूनच सुटणार 'लालपरी'

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार ५०० विशेष बसेस; महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठांना मोफत सेवा मुंबई :

Piyush Goyal : सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला मोदी सरकारच्या तपपूर्तीचा आढावा भारतीयांचे सामर्थ्य, समृद्धी,

Eknath Shinde : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील मुंबई : पवनराजे निंबाळकर

Amit Shah : शिवसेना एकच, एकनाथ शिंदेंची!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; भारत देश धर्मशाळा नाही, घुसखोरांना हद्दपार करणारच मुंबई : "एकनाथ शिंदे यांच्या