उद्धव ठाकरे हेच दंगलीचे मास्टरमाईंड!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या घटना घडताना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत दगडफेक झाली. त्यावरून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर आरोप केला होता. त्यांनी केलेल्या आरोपाला भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार पलटवार करत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. सध्या राज्यात ज्या काही दंगली होत आहेत, त्या दंगलीचा मास्टरमाईंड हे उद्धव ठाकरे आहेत, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, कालच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, दंगलीमागील सूत्रधार शोधा. मी अजित पवारांना सांगेन की या ज्या दंगली होत आहेत, त्याचा मास्टरमाईंड काही दिवसांपूर्वी तुमच्या सिल्व्हर ओकमध्ये आला होता. शरद पवार साहेबांच्या शेजारी बसला होता. कलानगर त्याचा पत्ता. मी वारंवार सांगतोय, २००४ मध्ये दंगल घडवून मुख्यमंत्री होण्याची इच्छा या सुप्त डोक्यातून बाहेर पडली. ती इच्छा आणि स्वप्न अजूनही मेलेले नाही. दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा, हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. कारण १९९३ च्या दंगलीनंतर १९९५ मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आली, असे सांगणारे उद्धव ठाकरे २००४ मध्ये तसाच प्रयत्न करत होते. २००४ मध्ये झालेल्या बैठकीला माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याची पुष्टी देऊ शकतात. उद्धव ठाकरे हे या दंगलीचे सूत्रधार आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.


राणे म्हणाले की, ठाकरे गटातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन नेते एकमेकांचे तोंडही पाहत नव्हते. आता त्यांचे सूर मिळायला लागले आहेत. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. ही दंगलीची योजना आहे का? मुस्लिम समाजात दंगली घडवून मते वाढवण्याचा उद्धवजींचा डाव पुन्हा एकदा घडत आहे का? पवारसाहेबांनी हे ओळखावे, असे राणे म्हणाले. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने चादर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते आग्रह करतात. महाराजांच्या गड किल्ल्यावर सर्वप्रथम अतिक्रमण सुरू केले. आता धार्मिक स्थळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्याही घरात देखील येतील, असे राणे म्हणाले.


कर्नाटकात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. काँग्रेसचे खरे मनसुबे उघड झाले आहेत. त्यांना महत्त्वाचे खाते देण्याची काँग्रेसची बांधिलकी आहे. असाच प्रयत्न त्यांच्या धार्मिक स्थळावर झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटला असता. हिंदू एकसंध नाहीत हे त्यांना माहीत आहे. हिंदू समाज झोपला आहे. ही शोकांतिका असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.


आम्हाला हिंदू समाजाचा पाठिंबा मिळायला हवा. कर्नाटकात जिहादी सत्तेवर आले आहेत. राज्यातही तेच चित्र रंगले. त्यासाठी रजा अकादमी, ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक झाली. चादर चढवणे, छत्रपतींच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचे आदेश देणे हे पूर्व नियोजित केलेले षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त