वर्षभरात मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न शून्यच!

  230

नांदगाव (प्रतिनिधी) : दर्यात मच्छीच मिळत नसल्यामुळे मच्छीमारांचा अखेरचा हंगामही वायाच गेला आहे. गेले वर्षभर मुरूड, राजपुरी, एकदरा, नांदगाव, बोर्ली, कोर्लई, दिघी समुद्र आणि खाडीपट्टीतील मच्छीमार अशीच स्थिती अनुभवत असून मच्छी कधी ना कधी मिळेल या आशेवर वर्षभर मच्छीमारांना केवळ प्रतिक्षाच करावी लागल्याचे भयाण चित्र पुढे आले आहे. येथील पारंपरिक मच्छीमारांना मोठीच काय पण छोटी मासळी मिळण्याची शक्यता हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात देखील मावळल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक मच्छीमारांना १ जून पूर्वीच मासेमारी नौका नाईलाजाने किनाऱ्यावर आणाव्या लागल्याचे दिसून आले आहे.



काही मालकांनी नौकांचे कडू तेल, मीठ यांचे मिश्रणांतून बनलेले 'चोप्रान' लावण्यास घेतले असल्याचे रविवारी सकाळी दिसून आले. सर्व नौका पूर्णतः किनाऱ्यावर ओढून साकारण्यात आलेल्या नसून किनाऱ्यावरील खाडीत नांगरून ठेवलेल्या दिसून येत आहेत. मुंबईकडे जाळीने मासेमारी करणाऱ्या नौका काही अजून १५ दिवसांचा मासेमारी कालावधी बाकी असल्याने मुंबईच्या समुद्रपट्टीत कार्यरत आहेत. मासळी मिळत नसल्याने काही खलाशी किंवा नाखवा मंडळींनी देखील अलिबाग परिसरात मासेमारीपूरक व्यवसायाकडे जाऊन चाकरी सुरू केल्याची माहिती एकदरा या गावातील मच्छीमारांनी दिली.



समुद्रात मासळीचा पडलेला दुष्काळ पाहता भविष्यात लाखो मच्छीमार कुटुंबांना हा धोक्याचा इशारा तर नाही ना?, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यांतील खाडीपट्ट्यात तर साधा जवळा, मांदेली, बोंबील, खारवा, वाकट्या, काटेरी छोटी मासळी देखील मिळत नसून शेकडो मच्छीमारांना उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे.



जवळा मासळीचा हंगाम असूनही ही छोटी मासळी देखील गायब असल्याने याचा अनेक अनुभवी मच्छीमारांना देखील धक्का बसला असून, १५ दिवस बाकी असूनही अखेर मासेमारी अंशतः व थांबविण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. मच्छीमार सहकारी संस्थाना देखील मासळी दुष्काळा कडे अखेर हात टेकावे लागल्याचे दिसून येत आहे. सामान्य मच्छीमारांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असून, पुढची वाटचाल कठीण बनल्याचे दिसून येत आहे.


अखेरचे १५ दिवस हाती शिल्लक
१ जून २०२३ नंतर पावसाळ्यात जुलै २३ पर्यंत दोन महिने मासेमारी बंद ठेवण्याचे शासकीय परिपत्रक आले असून, आता अखेरचे १५ दिवस हाती शिल्लक आहेत. सतत वादळी वारे, येणारी वादळे आणि बदलते वातावरण, जेलिफिश मासळीचे आक्रमण यामुळे वर्षभर समुद्रात मासेमारीला ब्रेक मिळाला. बेकायदेशीर पर्सनीन, एलईडी मासेमारीला मात्र मासळी मिळत होती. याउलट पारंपरिक मच्छीमार मासेमारीस जाऊनही रिकाम्या हाताने अनेकवेळा परत येतानाचे चित्र दिसून आले. पारंपारिक मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना मासळी मिळत नसल्याने त्यांचे खूप नुकसान झाले असून, शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत नसल्याने मच्छीमार कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.


महागडी मासळी
मच्छीबाजारामध्ये बाहेरून येणारी महागडी मासळी पर्यटक आणि स्थनिक नागरिकांना घेण्याशिवाय मार्ग नसल्याचे रविवारी दिसून आले. कोलंबी सोडे देखील महागले असून किलोचा दर रु.१८००/- इतका झाला आहे, त्यामुळे ताजी मासळी खाण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सुक्या मासळीवर भरवसा ठेवून खरेदीसाठी जावे लागत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण