अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष व इतर पदांसाठीची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली. यात नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची प्रचंड बहुमताने निवड झाली आहे. त्यांना ६० पैकी ५० मतं मिळाली आहेत. निवडणुकीत प्रामुख्याने प्रशांत दामलेंच्या 'रंगकर्मी' आणि प्रसाद कांबळींच्या 'आपलं पॅनल'मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.


नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी पत्रकार परिषद घेत अध्यपदाच्या निवडणूकीसंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की,"नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली आहे. कार्यवाहपदी अजित भुरे निवडून आले आहेत. तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष उपक्रमपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे".


प्रशांत दामलेंच्या 'रंगकर्मी'च्या ११ जणांची नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीवर निवड झाली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.


गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी प्रचार सुरु होता आणि काही राजकीय नेत्यांनीदेखील यात सहभाग घेतला होता. अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणा-या प्रशांत दामले यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांचा तर प्रसाद कांबळी यांना भाजप आमदार आशिष शेलार यांचा पाठिंबा होता. त्यामुळे नाट्यवर्तुळासह राजकीय वर्तुळाचंही या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होतं. यात आता रंगकर्मीने बाजी मारली आहे.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा