कोंडिवडे पूल झालाय धोकादायक; नवीन पूल बांधण्याची गरज

कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील कोंडिवडे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेला पूल धोकादायक झाला आहे. या पुलाची सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्ती केलेली नाही. या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याची गरज असून, त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्याची देखील गरज निर्माण झाली आहे.



तालुक्यातील चिंचवली-उकरूळ-कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडिवडे या राज्यमार्ग रस्त्यावर कोंडिवडे गावाच्या अलीकडे ३० फूट उंचीचा लहान पूल आहे. हा पूल अनेक वर्षे शासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून दुरुस्त करण्यात आला नाही. या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी खर्च केला जात आहे. खांडपे आणि कोंदिवडे गावाच्या मध्ये हा पूल आहे. २५ फूट लांबीचा हा पूल बांधून ४० वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, पुलाची बांधणी केल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग या पुलाची दुरुस्ती केलेली नाही, त्यामुळे पूल धोकादायक बनला असून या पुलाच्या कठड्याला एखादे वाहन जरी धडकले तरी ते वाहन खाली कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. हा पूल अपघातग्रस्त होऊन बंद पडल्यास वाहतुकीसाठी कोंदिवडे, चोची, कोंढाणे तसेच मुंढेवाडी या गावांमधील वाहनचालकांना अडचणी निर्माण होणार आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी चाचपणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

वाडा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

कुडूस  : वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत ही

वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

विरारमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पालिकेच्या गार्डनमध्ये दुर्घटना

विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११