कोंडिवडे पूल झालाय धोकादायक; नवीन पूल बांधण्याची गरज

कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील कोंडिवडे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेला पूल धोकादायक झाला आहे. या पुलाची सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुरुस्ती केलेली नाही. या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याची गरज असून, त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्याची देखील गरज निर्माण झाली आहे.



तालुक्यातील चिंचवली-उकरूळ-कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडिवडे या राज्यमार्ग रस्त्यावर कोंडिवडे गावाच्या अलीकडे ३० फूट उंचीचा लहान पूल आहे. हा पूल अनेक वर्षे शासनाच्या कोणत्याही यंत्रणेकडून दुरुस्त करण्यात आला नाही. या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी खर्च केला जात आहे. खांडपे आणि कोंदिवडे गावाच्या मध्ये हा पूल आहे. २५ फूट लांबीचा हा पूल बांधून ४० वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, पुलाची बांधणी केल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग या पुलाची दुरुस्ती केलेली नाही, त्यामुळे पूल धोकादायक बनला असून या पुलाच्या कठड्याला एखादे वाहन जरी धडकले तरी ते वाहन खाली कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. हा पूल अपघातग्रस्त होऊन बंद पडल्यास वाहतुकीसाठी कोंदिवडे, चोची, कोंढाणे तसेच मुंढेवाडी या गावांमधील वाहनचालकांना अडचणी निर्माण होणार आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी चाचपणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

शंभरापेक्षा अधिक जाहिरात फलकांवर कारवाई

विरार (प्रतिनिधी) : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या जाहिरातदारांवर मागील आठवडाभरात १० गुन्हे दाखल करण्यात

शहरात दिवाळीपूर्वी खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर करडी नजर

विरार (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी

विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

विरार : विरार पश्चिमेच्या ओलांडा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून

जिल्ह्यातील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

पालघर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन

वसई-विरार पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

विरार (प्रतिनिधी): वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप

विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून