नऊ दिवसांत ‘द केरला स्टोरी’ने कमावले १०० कोटी

मुंबई (प्रतिनिधी) : ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा सध्या भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेत आहे. आता हा सिनेमा केवळ भारतात नाही तर अन्य देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अभिनीत चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रचंड विरोध होऊनही ‘द केरळ स्टोरी’ स्टोरीने बंपर कमाई केलीय. देशात ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ची अवघ्या ९ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झाली आहे.



या चित्रपटाच्या यशाचे श्रेय निश्चितच त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. ‘केरळ स्टोरी’ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या बुधवारी म्हणजेच रिलीजच्या ६ व्या दिवशी देखील बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने बुधवारी एकाच दिवसात चांगलीच १२ कोटींची कमाई केली. मंगळवारपेक्षा त्यात १० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे अवघ्या ९ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ने केलेली कमाई ही बॉलिवूड सिनेमांना दिलासादायक ठरली आहे.



एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे निर्मात्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.



आता हा चित्रपट आणखी ३७ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील प्रमुख अभिनेत्री अदा शर्मा हिने स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.

Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या