नऊ दिवसांत ‘द केरला स्टोरी’ने कमावले १०० कोटी

मुंबई (प्रतिनिधी) : ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा सध्या भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेत आहे. आता हा सिनेमा केवळ भारतात नाही तर अन्य देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अभिनीत चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रचंड विरोध होऊनही ‘द केरळ स्टोरी’ स्टोरीने बंपर कमाई केलीय. देशात ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ची अवघ्या ९ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झाली आहे.



या चित्रपटाच्या यशाचे श्रेय निश्चितच त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. ‘केरळ स्टोरी’ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या बुधवारी म्हणजेच रिलीजच्या ६ व्या दिवशी देखील बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने बुधवारी एकाच दिवसात चांगलीच १२ कोटींची कमाई केली. मंगळवारपेक्षा त्यात १० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे अवघ्या ९ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ने केलेली कमाई ही बॉलिवूड सिनेमांना दिलासादायक ठरली आहे.



एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे निर्मात्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.



आता हा चित्रपट आणखी ३७ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील प्रमुख अभिनेत्री अदा शर्मा हिने स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.

Comments
Add Comment

BMC News : सहाय्यक आयुक्तांच्या दालनाचे ऑडिट करा; सभागृह नेते गणेश खणकर यांची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत पावणे चार वर्षे प्रशासकीय राज्य होते. त्यामुळे समिती अध्यक्षांची दालन

Ranichi Baug : राणीबागेतील वाघ, बिबटयांचा मांस मटणावर ताव; खरेदीला स्थायी समितीने दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) राणीबागेतील वाघ, बिबट्यांसह अन्य प्राण्यांना म्हैस व रेड्याचे मांस दिले जात असून या

Mumbai Water Cut : मुंबईवर पाणी संकटाची टांगती तलवार; १ मेपासून १०% पाणी कपात होणार ?

मुंबई : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीपेक्षा कमी

heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या

Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी