गुजरातच्या किनारपट्टीवर जप्त केला तब्बल १२ हजार कोटींचा ड्रग्ज साठा

  230

अहमदाबाद : गुजरातच्या किनारपट्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत इराणहून गुजरातला आणला जाणारा २६०० किलो ड्रग्जचा साठा पकडला आहे. भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याची गुप्त सूचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या ड्रग्जची किंमत तब्बल १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.


इराणहून गुजरातला आणले जाणारे हे अमली पदार्थ तिथे पोहोचण्यापूर्वीच नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेमुळे ताब्यात घेण्यात यश आले आहे. नौदलाच्या आयएनएस टीईजी F-14 या जहाजाने अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थाची खेप पकडली आहे. सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टीईजी तैनात करण्यात आली होती. तिथून परतताच ही मोठी कारवाई झाली आहे.


तस्करी करणा-या जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेऊन त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांविषयी तसंच ड्रग्जच्या तस्करीविषयी सविस्तर चौकशी केली जाणार आहे. सागरी मार्गाने भारतात आणली जाणारी ड्रग्जची आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप आहे.


याआधीही फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटने २००० कोटींच्या ड्रग्जची खेप पकडली होती. गुजरातच्या लगतच्या सागरी भागात अनेकवेळा कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.


Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.