गुजरातच्या किनारपट्टीवर जप्त केला तब्बल १२ हजार कोटींचा ड्रग्ज साठा

अहमदाबाद : गुजरातच्या किनारपट्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत इराणहून गुजरातला आणला जाणारा २६०० किलो ड्रग्जचा साठा पकडला आहे. भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याची गुप्त सूचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या ड्रग्जची किंमत तब्बल १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.


इराणहून गुजरातला आणले जाणारे हे अमली पदार्थ तिथे पोहोचण्यापूर्वीच नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेमुळे ताब्यात घेण्यात यश आले आहे. नौदलाच्या आयएनएस टीईजी F-14 या जहाजाने अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थाची खेप पकडली आहे. सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टीईजी तैनात करण्यात आली होती. तिथून परतताच ही मोठी कारवाई झाली आहे.


तस्करी करणा-या जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेऊन त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांविषयी तसंच ड्रग्जच्या तस्करीविषयी सविस्तर चौकशी केली जाणार आहे. सागरी मार्गाने भारतात आणली जाणारी ड्रग्जची आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप आहे.


याआधीही फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटने २००० कोटींच्या ड्रग्जची खेप पकडली होती. गुजरातच्या लगतच्या सागरी भागात अनेकवेळा कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.


Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा