नैतिकता शिल्लक असेल, तर ठाकरेंनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा

आमदार नितेश राणे यांचे आव्हान


कणकवली (प्रतिनिधी) : संजय राऊत यांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल आणि ते पुन्हा जेलमध्ये जातील, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथील प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब यांच्यामुळे ठाकरे गट संपला. अनिल देसाई काल कुठे होते? राऊतांनी आरे गेस्ट हाऊसमध्ये काय झाले हे महाराष्ट्राच्या जनतेला जरा सांगावे? नैतिकतेच्या गोष्टींवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे, संजय राऊत नैतिकतेची भाषा करताहेत. त्यांना विचारायचे आहे, अधिकृत शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे. उबाठा हे नाव कोर्टाने तात्पुरते दिले होते. उद्धव ठाकरेंना पक्षाचे वेगळे नाव आणि चिन्ह निवडावेच लागणार आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हा फेसबुक लाइव्ह केले होत त्याची क्लिप जनतेने पहावी तसेच त्याची आठवण उद्धव ठाकरेंना करून देताना नितेश राणे म्हणाले की, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदारपदाचा राजीनामा देतो, असे म्हटले होते. मग अजून आमदारकीचा राजीनामा का दिला नाही? तुमच्यात खरीच नैतिकता असेल, तर आमदारकीचाही राजीनामा द्या.



पुढे नितेश राणे म्हणाले की, नैतिकतेची भाषा तुम्ही करता. मुळात नैतिकतेच्या गोष्टी उद्धव ठाकरेंना शोभत नाहीत. २०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी लाड पुरविले आणि २०१९ नंतर याच उद्धव ठाकरेंनी घात केला. त्यामुळे त्यांना नैतिकतेच्या गोष्टी शोभत नाहीत त्यांनी आमदारकीचा राजीनामाच द्यावा. संजय राऊत ज्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतांवर खासदार झाले त्या खासदारकीचा पहिला राजीनामा द्या. मग बघू तुमची नैतिकता..! तीन महिन्यांत हे सरकार कोसळणार, असे उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात सांगितले होते. मात्र आता मे महिना आहे. काय झालं? माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींमुळे उद्धव ठाकरे आमदार झाले आहेत, हे देखील त्यांनी विसरू नये, असे नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी