अब तेरा क्या होगा संजय राऊत?

कणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत यांनी 'नंगा नाच' असा उल्लेख केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. संजय राऊत यांना अजून अक्कलदाढ आली नसल्याचं त्यांनी स्वतःच दाखवून दिलं आहे, असं नितेश राणे यावेळी म्हणाले. संजय राऊत जगातला सर्वात मोठा मूर्ख आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.

"नंगा नाच याबद्दल विश्लेषण कोणी करावं, तर संजय राऊत यांनी? तर मग मुंबईच्या आरे गेस्ट हाऊसमध्ये कोणता नंगा नाच होत होता याबद्दल त्यांनी माहिती द्यावी. दुसर्‍यांना नंगा बोलण्याआधी स्वतः कुठे कुठे कपडे काढले, याबद्दल सांगावं. नसेल जमत तर आम्ही नंगा नाच कशाला म्हणतात याची लिंक काही दिवसांत दाखवतो", असे खडेबोल यावेळी नितेश राणेंनी सुनावले.

पुढे नितेश राणे म्हणाले, "आज सकाळच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दोन्ही अनिलचे आभार मानले. आम्हीदेखील अनिल परब, अनिल देसाई आणि संजय राऊत यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे आज संपलेला माणूस आहे. म्हणून या तिघांचा नागरी सत्कार करण्याची संधी आम्हाला द्यावी". त्याचबरोबर प्रत्येक कोर्टामध्ये, निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहणारे अनिल देसाई कालच्या महत्त्वाच्या सुनावणीला कोर्टात का गेले नव्हते? असा सवाल उपस्थित करत हे उद्धव ठाकरेंना कळलं पाहिजे असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

हे सरकार बेकायदेशीर असून ते तीन महिनेच टिकणार आहे, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी आज पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. "हे सरकार आता अधिक भक्कम झालंय. माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार आहेत", असा विश्वास नितेश राणेंनी यावेळी दिला.

'अब तेरा क्या होगा संजय राऊत?' असा फिल्मी डायलाॅग मारत नितेश राणेंनी राऊतांना चांगलीच चपराक दिली आहे. सरकार तीन महिने टिकतंय की संजय राऊतांवर पुन्हा कैदी नंबर ८९, ५९ बनण्याची वेळ येतेय हे आपण बघू, असं नितेश राणे म्हणाले. संजय राऊतांना पत्राचाळीतल्या मराठी माणसांचे शाप लागणार, त्यांनी नैतिकतेची भाषा करु नये, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.
Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार