आता ना पद, ना पक्ष, ना चिन्ह…

वय आणि शरीर वाढलं तरी काही लोक डोक्याने बालिश असतात, उद्धव ठाकरे त्यांपैकी एक : नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर चारही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निकालाबाबत आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता उद्धव ठाकरेंबरोबर उरलेले आमदार आणि खासदार तरी राहतात का, हे उद्या सकाळपर्यंत कळेल असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.


आजचा दिवस बघायला मिळणं हा उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी दिलेला शाप असल्याचं नितेश राणे म्हणाले. "बाळासाहेब उभ्या आयुष्यभर हिंदुत्वाचा जो विचार घेऊन चालले त्या विचाराच्या विरोधात स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली, त्यामुळे नैतिकता उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही. स्वःच्या धर्माशी बेईमानी करणार्‍या माणसासोबत असंच झालं पाहिजे", असे नितेश राणे म्हणाले.


"वय आणि शरीर वाढलं तरी काही लोक डोक्याने बालिश असतात, उद्धव ठाकरे त्यांपैकी एक आहेत. आता ना पद, ना पक्ष, ना चिन्ह! त्यामुळे बोंबलून किंवा संविधानाला शिव्या घालून काहीच होणार नाही. जो निकाल आहे तो मान्य करा अथवा स्वतःचा नवीन पक्ष उभारुन त्याला नवीन नाव व चिन्हं देऊन महाराष्ट्रभर फिरा", असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच