आता ना पद, ना पक्ष, ना चिन्ह…

  112

वय आणि शरीर वाढलं तरी काही लोक डोक्याने बालिश असतात, उद्धव ठाकरे त्यांपैकी एक : नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर चारही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निकालाबाबत आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता उद्धव ठाकरेंबरोबर उरलेले आमदार आणि खासदार तरी राहतात का, हे उद्या सकाळपर्यंत कळेल असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.


आजचा दिवस बघायला मिळणं हा उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी दिलेला शाप असल्याचं नितेश राणे म्हणाले. "बाळासाहेब उभ्या आयुष्यभर हिंदुत्वाचा जो विचार घेऊन चालले त्या विचाराच्या विरोधात स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली, त्यामुळे नैतिकता उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही. स्वःच्या धर्माशी बेईमानी करणार्‍या माणसासोबत असंच झालं पाहिजे", असे नितेश राणे म्हणाले.


"वय आणि शरीर वाढलं तरी काही लोक डोक्याने बालिश असतात, उद्धव ठाकरे त्यांपैकी एक आहेत. आता ना पद, ना पक्ष, ना चिन्ह! त्यामुळे बोंबलून किंवा संविधानाला शिव्या घालून काहीच होणार नाही. जो निकाल आहे तो मान्य करा अथवा स्वतःचा नवीन पक्ष उभारुन त्याला नवीन नाव व चिन्हं देऊन महाराष्ट्रभर फिरा", असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना