आता ना पद, ना पक्ष, ना चिन्ह…

वय आणि शरीर वाढलं तरी काही लोक डोक्याने बालिश असतात, उद्धव ठाकरे त्यांपैकी एक : नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर चारही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निकालाबाबत आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता उद्धव ठाकरेंबरोबर उरलेले आमदार आणि खासदार तरी राहतात का, हे उद्या सकाळपर्यंत कळेल असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.


आजचा दिवस बघायला मिळणं हा उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी दिलेला शाप असल्याचं नितेश राणे म्हणाले. "बाळासाहेब उभ्या आयुष्यभर हिंदुत्वाचा जो विचार घेऊन चालले त्या विचाराच्या विरोधात स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली, त्यामुळे नैतिकता उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही. स्वःच्या धर्माशी बेईमानी करणार्‍या माणसासोबत असंच झालं पाहिजे", असे नितेश राणे म्हणाले.


"वय आणि शरीर वाढलं तरी काही लोक डोक्याने बालिश असतात, उद्धव ठाकरे त्यांपैकी एक आहेत. आता ना पद, ना पक्ष, ना चिन्ह! त्यामुळे बोंबलून किंवा संविधानाला शिव्या घालून काहीच होणार नाही. जो निकाल आहे तो मान्य करा अथवा स्वतःचा नवीन पक्ष उभारुन त्याला नवीन नाव व चिन्हं देऊन महाराष्ट्रभर फिरा", असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात