विहिरींनी तळ गाठल्याने टाकीपठार परिसरात भीषण पाणीटंचाई

हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट


शहापूर (वार्ताहर) : मुंबई व उपनगरांना पाणी पुरवठा करणारा शहापूर हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र 'धरण उशाला आणि कोरड घशाला', अशीच काहीशी परिस्थिती शहापूर तालुक्याची झाली असून, अतीदुर्गम व आदिवासी बहुल परिसर असणाऱ्या टाकीपठार भागात अनेक विहीरींनी तळ गाठल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.


या परिसरातील मधलीवाडी, कवटेवाडी, चाफेचीवाडी, टाकीचीवाडी, कुंभचीवाडी या टाकीपठार परिसरातील प्रत्येकी वाडीमध्ये २०० च्या आसपास लोकवस्ती असणाऱ्या वाड्यांतील महिलांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा महिलांना आपल्या लहानग्यांना घरातच सोडून पाण्भयासाठी भटकंती करावी लागते. पाण्याचे एकमेव स्त्रोत असणाऱ्या विहीरी तळ गाठू लागल्यामुळे हंडाभर पाणी मिळवण्यासाठी एक ते दीड किलोमीटर महिलांना आपला कामधंदा सोडून पायपीट करावी लागत आहे. शाळेतील मुलीही घरातील माणसांना मदत व्हावी, म्हणून शाळेला दांडी मारून पाणी भरण्यासाठी घरी थांबत असल्याची माहिती काही महिलांनी दिली.


यावेळी ग्रामस्थ हिरु जैतु किडका यांनी केवळ महिलाच नव्हे; तर पाण्यासाठी वयोवृध्दांनाही डोक्यावर हंडा घेऊन पाण्याचा शोध घ्यावा लागतो, अशी वेळ आज आली आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.

तर पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता विकास जाधव ज्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे, अशा ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी टँकरची मागणी केल्यास वरिष्ठांना पत्रव्यवहार करुन तत्काळ टँकर मंजूर करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.
Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील