जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पाणीसाठा!

पालघर (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि सहा लघु पाटबंधारे प्रकल्प असून, त्यामध्ये मिळून ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ प्राधिकरण आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे.



पालघर, डहाणू, वसई या तालुक्यांतील सिंचनासाठी, नागरी भागात पुरवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्राला पुरविण्यात येणाऱ्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या २७६.३५ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ९४.३०९ दघमी म्हणजे ३४.१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ९८.७६५ म्हणजेच ३५.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर कवडास बंधाऱ्यातून ९.९६ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ८.३६० दघमी म्हणजेच ८३.९४ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षी ९.८१० दघमी म्हणजेच ९८.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक