जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पाणीसाठा!

पालघर (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि सहा लघु पाटबंधारे प्रकल्प असून, त्यामध्ये मिळून ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ प्राधिकरण आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे.



पालघर, डहाणू, वसई या तालुक्यांतील सिंचनासाठी, नागरी भागात पुरवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्राला पुरविण्यात येणाऱ्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या २७६.३५ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ९४.३०९ दघमी म्हणजे ३४.१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ९८.७६५ म्हणजेच ३५.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर कवडास बंधाऱ्यातून ९.९६ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ८.३६० दघमी म्हणजेच ८३.९४ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षी ९.८१० दघमी म्हणजेच ९८.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या

राज्यातील भाजपा खासदाराचा पहाटे भीषण अपघात, एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले

पालघर : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (MP Dr.

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे