दीपक हुडा फलंदाजीसाठी आला, तेव्हाच लखनऊने सामना गमावला

विरेंद्र सेहवागचे मत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊने दहा षटकांनंतर एक गडी गमावून १०२ धावा केल्या होत्या. या धावसंख्येनंतर त्यांनी सामना एवढ्या मोठ्या फरकाने गमावला नसता. पहिला गडी तंबूत परतल्यानंतर त्यांनी फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला पाठवायला हवे होते. दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनऊने सामना गमावला, असे मत भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने व्यक्त केले. गुजरातविरुद्ध रविवारी झालेल्या लखनऊच्या पराभवानंतर सेहवागने आपले मत व्यक्त केले. एका क्रिडा वाहिनीशी सेहवाग बोलत होता.


सेहवाग म्हणाला की, पहिली विकेट पडल्यानंतर निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, स्वतः कर्णधार कृणाल पंड्या किंवा चेन्नईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वेगवान धावा करणारा आयुष बडोनी यांच्यापैकी एखादा फलंदाज खेळू शकला असता. पण दीपक हुडा फलंदाजीला आला. जो सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे." दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनऊने सामना गमावला असे सेहवाग म्हणाला.


२२८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने अप्रतिम सुरूवात केली होती. क्विंटन डिकॉक (७०) आणि कायल मेयर्स (४८) यांनी सामन्यात चुरस आणली होती. नवव्या षटकात कायल मेयर्स बाद झाल्यानंतर दीपक हुडा खेळपट्टीवर आला. यानंतर लखनऊची धावगती मंदावली आणि संघावर दबाव वाढत गेला. हुडा सध्या फॉर्ममध्ये दिसत नाही. पहिल्या ९ सामन्यांत त्याने केवळ ५३ धावा केल्या. त्याचबरोबर निकोलस पूरन आणि आयुष बडोनी हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण लखनऊच्या व्यवस्थापनाने दीपक हुडावर विश्वास दाखवला. याचाच दाखला देत विरेंद्र सेहवागने लखनऊच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील