दीपक हुडा फलंदाजीसाठी आला, तेव्हाच लखनऊने सामना गमावला

विरेंद्र सेहवागचे मत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊने दहा षटकांनंतर एक गडी गमावून १०२ धावा केल्या होत्या. या धावसंख्येनंतर त्यांनी सामना एवढ्या मोठ्या फरकाने गमावला नसता. पहिला गडी तंबूत परतल्यानंतर त्यांनी फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला पाठवायला हवे होते. दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनऊने सामना गमावला, असे मत भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने व्यक्त केले. गुजरातविरुद्ध रविवारी झालेल्या लखनऊच्या पराभवानंतर सेहवागने आपले मत व्यक्त केले. एका क्रिडा वाहिनीशी सेहवाग बोलत होता.


सेहवाग म्हणाला की, पहिली विकेट पडल्यानंतर निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, स्वतः कर्णधार कृणाल पंड्या किंवा चेन्नईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वेगवान धावा करणारा आयुष बडोनी यांच्यापैकी एखादा फलंदाज खेळू शकला असता. पण दीपक हुडा फलंदाजीला आला. जो सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे." दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनऊने सामना गमावला असे सेहवाग म्हणाला.


२२८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने अप्रतिम सुरूवात केली होती. क्विंटन डिकॉक (७०) आणि कायल मेयर्स (४८) यांनी सामन्यात चुरस आणली होती. नवव्या षटकात कायल मेयर्स बाद झाल्यानंतर दीपक हुडा खेळपट्टीवर आला. यानंतर लखनऊची धावगती मंदावली आणि संघावर दबाव वाढत गेला. हुडा सध्या फॉर्ममध्ये दिसत नाही. पहिल्या ९ सामन्यांत त्याने केवळ ५३ धावा केल्या. त्याचबरोबर निकोलस पूरन आणि आयुष बडोनी हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण लखनऊच्या व्यवस्थापनाने दीपक हुडावर विश्वास दाखवला. याचाच दाखला देत विरेंद्र सेहवागने लखनऊच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला.

Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून