मणिपूरमधून बाहेर पडण्यासाठी कोलकाताचे नागरिक मोजत आहेत तब्बल २५ हजार रुपये

इंफाळ : गेले काही दिवस मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचारामुळे अनेक लोक तिथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर तेथून घरी परतणाऱ्यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून, राज्यात राहणारे कोलकाताचे लोक कोणत्याही मार्गाने आपल्या घरी परतण्याची घाई करत आहेत. यामुळे इंफाळ ते कोलकाता खाजगी विमानांचे भाडे २५,००० रुपयापर्यंत पोहोचले आहे, जे सामान्य किमतीपेक्षा ८ पट जास्त आहे. साधारणपणे, दोन शहरांमधील विमान प्रवासाचे भाडे जवळपास २५०० ते ३००० रुपये आहे.


इथून तात्काळ बाहेर पडण्यासाठी हजारो लोक आपल्या विमानाची वाट पाहत होते. बरेच लोक विमानाची वाट पाहत जमिनीवर बसलेले किंवा झोपलेले आहेत. शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पाहता, विमानतळ सार्वजनिक बस स्टॅंड किंवा रेल्वे स्टेशनसारखे दिसते होते.


इंफाळ - कोलकातादरम्यान उड्डाण करणार्‍या विमान कंपन्यांनी सांगितले की, कोलकाता येथे जाणारी सर्व उड्डाणे सुरू आहेत. तसेच वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त उड्डाणे चालविण्यात येत आहे. मात्र ट्रॅव्हल एजंटच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही. कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंफाळहून सुटणारी सर्व उड्डाणे फूल आहेत आणि तिकिटाची मागणी लक्षणीय वाढली आहे.



दरम्यान, शहरातील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही शहरात कुठेच इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. दुकानेही बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रविवारी बाजारपेठा आणि दुकाने काही तास खुली होती, परंतु या काळात लोकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या होत्या आणि फक्त विमान तिकीट असलेले लोक घराबाहेर पडत होते.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू