किल्ले रायगड संवर्धनाचे काम संथगतीने सुरू

अलिबाग (प्रतिनिधी) : किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असला तरी, भारतीय पुरातत्त्व विभागाकडून किल्ला जतन व संवर्धनाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. १९ पैकी केवळ २ कामेच विभागाने पूर्ण केली असून असून, साडेआठ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.



हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडाच्या जतन व संवर्धनासाठी राज्यसरकारने साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धना बरोबरच या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास या कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे. यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना राज्यसरकारने केली आहे. रायगडसाठी बांधकाम विभागाचे विशेष स्थापत्य पथक नेमण्यात आले आहे. जेणेकरून किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करता येणार आहे. पण तरीही गड जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामांना गती मिळू शकलेली नाही.



कार्यकारी अभियंता विशेष स्थापत्य पथक रायगड यांच्या माध्यमातून २०१६ ते २०२३ पर्यंत एकूण १११ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी केवळ ५० कामे पूर्ण झाली आहेत. ३८ कामे सध्या सुरू आहेत. २३ कामांना अद्याप सुरुवातही होऊ शकलेली नाही. किल्ला संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व विभागामार्फत केले जात आहे. यासाठी त्यांना ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गड संवर्धनाच्या १९ कामांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी केवळ दोन कामे पूर्ण झाली असून, १२ कामे प्रगतिपथावर आहेत. ४ कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.



किल्ले रायगडावर यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. २ जून ते सहा जून दरम्यान तिथी आणि तारखेनुसार या सोहळ्यांचे आयोजन केले जाणार आहे. त्यापूर्वी गडसंवर्धनाची कामे नेटाने गती देऊन पूर्ण करणे गरजेचे असणार आहे.


"किल्ला जतन करण्याची कामे हे कौशल्यपूर्ण होणे अपेक्षित आहे. गडाच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता ही कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे पुरातत्त्व विभागाची अखत्यारीत असलेल्या कामे घाईगडबडीत होऊ शकत नाहीत. त्याला योग्य वेळ द्यावा लागेल. पण जास्त मनुष्यबळ लावून कामाची गती वाढवा, यासाठी पाठपुरावा करता येईल".
- रघुजीराजे आंग्रे, सदस्य रायगड प्राधिकरण.


"गडावरील संवर्धनाची कामे संथगतीने सुरू असून कामांचा वेग वाढवायला हवा. गडावर झालेल्या उत्खननात काय सापडले याचे अहवाल पुरातत्त्व विभागाने प्रसिद्ध करायला हवेत. ज्या अहवालांचा फायदा इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना होऊ शकेल. गडसंवर्धनाच्या कामाचा वेग वाढायला हवा".
- डॉ. अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह