मुंबईतील पारबंदर प्रकल्पाने गाठला महत्त्वाचा टप्पा

  190

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पारबंदर प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे गाठला असून प्रकल्पाच्या ६९व्या ‘ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक’ची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे.



मुंबई-नवी मुंबई प्रवास सुकर आणि वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने २१.८० किमी लांबीच्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पातील एकूण ७० ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकपैकी ६९व्या, तर टप्पा २ मधील शेवटच्या ‘ओएसडी’ची शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यशस्वीपणे उभारणी केली. दरम्यान शेवटच्या ७०व्या ‘ओएसडी’ची उभारणी १२ मे रोजी करण्यात येणार असून ‘ओएसडी’चे काम पूर्ण होणार आहे. हे सर्व ७० ‘ओएसडी’ बसविण्याचे आव्हानात्मक काम एमएमआरडीएने केवळ १६ महिन्यांत पूर्ण केले आहे.



सागरी सेतू अत्यंत मजबूत करण्यासाठी, तसेच काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी एमएमआरडीएने प्रकल्पात अत्याधुनिक अशा ‘ऑर्थोट्रोपिक स्टील डेक’ परदेशी तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच भारतात मुंबई पारबंदर प्रकल्पात वापर केला आहे. टप्पा २ मध्ये ३ जानेवारी २०२२ रोजी पहिला ‘ओएसडी’ बसविण्यात आला, तर शुक्रवारी प्रकल्पातील ६९व्या ‘ओएसडी’ची यशस्वी उभारणी करण्यात आली.
आतापर्यंत प्रकल्पाचे अंदाजे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण करून हा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले