विमानात महिलेला विंचूदंश

Share

मुंबई (वार्ताहर) : एअर इंडियाच्या विमानात एका महिलेला विंचू चावल्याची घटना घडली आहे. तातडीने त्या महिलेला विमानतळावर उतरल्यावर डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने शनिवारी दिली. ही घटना २३ एप्रिल रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी महिला काही कामानिमित्त नागपूरला गेली होती. महिला एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई फ्लाइटने परतत होती. निर्धारित वेळेत महिला विमानात बसली. त्यानंतर विमानानेही नियोजित वेळेवर उड्डाण केले. विमान आकाशात पोहोचताच अचानक या महिलेचा आरडाओरडा झाला. फ्लाइट अटेंडंटने तातडीने तिच्याजवळ जाऊन चौकशी केली असता महिलेला विंचू चावल्याचे समजले. ही बातमी ऐकून बाकीचे प्रवासीही घाबरले. या घटनेनंतर गोंधळात संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला, मात्र विंचू कुठेच सापडला नाही. तर दुसरीकडे महिलेची प्रकृती गंभीर होत होती. रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. डॉक्टरांनी तिला रात्रभर हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज दिला.

विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर विंचू सापडला. यानंतर कीड नियंत्रणाची योग्य प्रक्रिया विमानात करण्यात आली.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago