भटक्या कुत्र्यांचा त्रास थांबणार?

मुंबई (प्रतिनिधी) : भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे मुंबईकरांना रात्री अपरात्री, भल्या पहाटे त्रासाला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा कुत्र्याने लचके तोडल्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे मुंबईत भटक्या कुत्र्यांची सध्या संख्या नेमकी किती आहे? हे कळावे यासाठी पालिकेने भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपासून या कामाला सुरुवात होणार आहे. गणनेच्या कामाकरिता मान्यताप्राप्त संस्थेची निवड केली आहे.



मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे लागणे, पहाटे, रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्यावर हल्ला करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे मुंबईकरही या भटक्या कुत्र्यांपासून हैराण असतात. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून जूनपासून भटक्या कुत्र्यांची गणना होणार आहे. जूनपासून पुढील तीन ते चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांची गणना करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी साडेतीन लाख मुंबईकरांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. सन २०१४ मध्ये मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून श्वानांची गणना केली असता मुंबईत २ लाख ९६ हजार २२१ भटके कुत्रे आढळले होते.



मात्र सध्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती? हे कळलेले नाही. याचा शोध घेण्यासाठी ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.


भटके कुत्रे दुचाकींच्या पाठी लागण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे दुचाकीस्वाराचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. तसेच पहाटे, मध्यरात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद

आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणाऱ्या क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची गावस्करांची मागणी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही एक अशी लीग आहे, ज्यात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण