भटक्या कुत्र्यांचा त्रास थांबणार?

  264

मुंबई (प्रतिनिधी) : भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे मुंबईकरांना रात्री अपरात्री, भल्या पहाटे त्रासाला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा कुत्र्याने लचके तोडल्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे मुंबईत भटक्या कुत्र्यांची सध्या संख्या नेमकी किती आहे? हे कळावे यासाठी पालिकेने भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपासून या कामाला सुरुवात होणार आहे. गणनेच्या कामाकरिता मान्यताप्राप्त संस्थेची निवड केली आहे.



मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे लागणे, पहाटे, रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्यावर हल्ला करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे मुंबईकरही या भटक्या कुत्र्यांपासून हैराण असतात. ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून जूनपासून भटक्या कुत्र्यांची गणना होणार आहे. जूनपासून पुढील तीन ते चार महिन्यांत भटक्या कुत्र्यांची गणना करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी साडेतीन लाख मुंबईकरांना चावा घेतल्याने ते जखमी झाले. सन २०१४ मध्ये मुंबई महापालिकेने ह्युमन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून श्वानांची गणना केली असता मुंबईत २ लाख ९६ हजार २२१ भटके कुत्रे आढळले होते.



मात्र सध्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती? हे कळलेले नाही. याचा शोध घेण्यासाठी ह्युमन सोसायटी इंटर नॅशनल संस्थेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची गणना होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.


भटके कुत्रे दुचाकींच्या पाठी लागण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे दुचाकीस्वाराचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. तसेच पहाटे, मध्यरात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.