किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात मुंबईच्या डबेवाल्यांची उपस्थिती

मुंबई : इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आज ६ मे रोजी इंग्लंडचे नवे राजा म्हणून प्रिन्स किंग चार्ल्स तिसरे शपथ घेणार आहेत. आज त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चक्क मुंबईच्या डबेवाल्यांनादेखील निमंत्रण मिळाले आहे.


मुंबईचे डबेवाले आणि किंग चार्ल्स यांचं जुने मैत्री संबंध आहेत. गेल्या वर्षी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्व डबेवाल्यांनी मुंबईत प्रार्थना सभा घेतली होती. ही मैत्री लक्षात घेता भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त यांनी हॉटेल ताज येथे राज्याभिषेकानिमित्त आयोजित केलेल्या समारंभाचे निमंत्रण त्यांना दिले होते.


या निमंत्रणाचा मान राखत या समारंभाला किंग चार्ल्स यांचे जवळचे मित्र मानले जाणाऱ्या मुंबईतल्या डबेवाल्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईतील ताजमहल हॉटेलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात किंग चार्ल्स यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी डबेवाल्यांनी पुणेरी पगडी आणि शाल भेट म्हणून पाठवली आहे. तसेच डबेवाल्यांची ओळख असलेली गांधी टोपी देखील त्यांना भेट देण्यात आली आहे. ही माहिती मुंबई डबेवाला संघटनेच्या वतीने सुनील शिंदे यांनी दिली.



या कार्यक्रमाला मुंबईतील अनेक उद्योजक, महाराष्ट्र सर्कल सरकारमधील अधिकारी, कॉमनवेल्थ देशाचे कौन्सिल जनरल उपस्थित होते.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला