काँग्रेस दहशतवादाच्या पाठीशी!

'द केरला स्टोरी'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर निशाणा


बंगळुरू : 'द केरला स्टोरी' सिनेमा आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची सध्या संपूर्ण देशभरात मोठी चर्चा सुरु आहे. 'द केरला स्टोरी' बद्दल काही हिंदुविरोधी लोकांनी मुद्दामहून वाद सुरु केले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील रॅलीत भाषण करताना ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना थेट काँग्रेसवर निशाणा साधला.


कर्नाटकच्या बल्लारी येथील रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट दहशतवादाचे कुरूप सत्य दाखवते आणि दहशतवाद्यांच्या योजनांचा पर्दाफाश करते. हा चित्रपट दहशतवादी कटावर आधारित आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.





आपल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चित्रपटाला विरोध करून काँग्रेस दहशतवादाच्या पाठीशी उभी आहे हे यामधून दिसत आहे.


दरम्यान, धर्मनिरपेक्ष केरळ समाज हा चित्रपट कशासाठी स्वीकारेल, असे प्रतिपादन करत उच्च न्यायालयाने आज याचिकाकर्त्यांना विचारले की, हा चित्रपट काल्पनिक आहे, इतिहास नाही, त्यामुळे समाजात सांप्रदायिकता आणि संघर्ष कसा निर्माण होईल, असा सवाल याचिकाकर्त्यांना केला.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र