अवकाळी पावसामुळे कारल्याच्या शेतीचे नुकसान

कर्जत (वार्ताहर) : कर्जत-नेरळ रस्त्यावरील वडवळी गावातील रहिवाशी असलेले चिंतामण लदगे हे अनेक वर्षे कारल्याची शेती करतात. पाली भुतीवली धरणातील पाझरून येणारे पाणी उचलून भाजीपाला शेती करणारे कराळे यांच्या शेतातील कारल्याची शेती अवकाळी पावसाने वाया गेली आहे.


वडवली गावातील चिंतामण लदगे आणि त्यांच्या पत्नी गुलाब या आपल्या अपत्य नसल्याने शेतीलाच आपले मुलं मानतात. मुलगा -मुलगी नसल्याने त्याचे टेन्शन न घेता हे दांपत्य अनेक वर्षे भाजीपाला शेती करतात. २००४ मध्ये पाली भुतीवली धरणात पाणीसाठा झाला आणि त्यानंतर या धरणातील पाणी पाझरून नाल्यातून वाहण्यास सुरुवात झाली. त्याआधी तो नाला उन्हाळ्यात कोरडा असायचा. मात्र, आपल्या शेतीच्या बाजूने उन्हाळ्यात वाहणारे पाणी बघून चिंतामण लदगे यांनी उन्हाळ्यात दुबार शेती करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला शेतीमध्ये काहीसे अवघड पीक हे कारल्याची शेती समजली जाते. कारल्याचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्याला मांडव तयार करावा लागतो, त्या मांडवाच्या खाली कारल्याची वेल ही जमिनीपासून वर चढावी यासाठी दोरीने त्या वेली वरवर न्याव्या लागतात. त्याचवेळी कारल्याच्या वेलींना फळे आल्यावर त्या दोऱ्या तुटू नयेत आणि मांडव देखील कोसळू नये याची काळजी देखील शेतकऱ्याला घ्यावी लागते. त्यामुळे मशागतीच्या दृष्टीने काहीशी अवघड समजली जाणारी कारल्याचे पीक दामू कराळे हे गेली २० वर्षे आपल्या शेतातून घेत आहेत.


मार्च महिन्यातील अवकाळी पावसानंतर कारल्याचे उत्पादन साधारण बंद झाले आहे. जेमतेम महिनाभर कारल्याचे उत्पादन चिंतामण लदगे यांना त्यांच्या शेतातून मिळाले असून, किमान महिनाभर उत्पादन मिळू शकले नसल्याने या शेतकरी दांपत्याचे नुकसान झाले आहे.


५ किलो कारलीदेखील निघणे बंद


लदगे हे त्या काळात दिवसाआड भिवपुरी रोड येथून कल्याण येथील बाजारात कारल्याचे फळ विक्रीसाठी घेवून जायचे. त्यावेळी साधारण ४० ते ५० किलो इतका माल कल्याणच्या गावठी भाजीपाला बाजारात विकण्यासाठी उपलब्ध होता. मात्र, अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर पाच किलो कारलीदेखील शेतातून निघणे बंद होऊन बसले आहे.


Comments
Add Comment

Pune Crime : धक्कादायक! लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील सहकारनगर परिसरात अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्यास मोठी चालना; एअरट्रंकची ₹२ लाख कोटींची गुंतवणूक

मुंबई : महाराष्ट्राच्या डिजिटल पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र

CNG Car Fire : धूर निघाला अन् क्षणात भडका! पनवेलमध्ये उभ्या CNG वाहनाला भीषण आग; वाहन पूर्णतः जळून खाक

पनवेल : पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका सीएनजी वाहनाला अचानक

गावाला जाते म्हणून निघायची, अन् गर्दीचा फायदा घेत महिला करायची 'हे' कांड

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या एका

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई : मधुर आणि सुश्राव्य आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी

Goras Bhandar : वर्ध्याच्या ‘गोरस भंडार’वर छापा, २५.८६ लाखांचा साठा जप्त, उत्पादन निर्मिती बंद

वर्धा : गोरसपाक हा देशभर प्रसिद्ध खाद्यपदार्थ तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थसाठी ग्राहकांच्या उड्या गोरस भंडार या