तहसील कार्यालय परिसरात स्वच्छतागृहाची सोय करण्याची जनतेकडून मागणी

  324

पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालयात सामान्य नागरिकांना स्वच्छतागृहाची सोय नसल्याने त्यांना इतरत्र जावे लागते. त्यामुळे स्वच्छता गृहाची सोय तहसीलदार कार्यालय परिसरात केली पाहिजे, अशी जनतेकडून मागणी केली जात आहे.



या पूर्वी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी कार्यालयाशेजारी स्वच्छतागृह होते, पण आता सामान्य नागरिकांसाठी ते कार्यालयाबाहेर सेवाभावी संस्थेने बांधले आहे. तेही तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बंद करून ठेवलेले असल्याने सामान्य नागरिकांना पंचायत समितीच्या स्वच्छता गृहा वापर करावा लागत आहे. तालुका पोलीस ठाणेही याच कार्यालयात असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.



आपल्या विविध प्रकारच्या कामांसाठी पालघर तहसीलदार कार्यालयात बाहेरगावांहून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. आता शालेयपूर्व दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. महिला तसेच वयोवृद्ध नागरिकांना स्वच्छतागृहाची आवश्यकता भासते. स्वच्छतागृह कुठे आहे? असे महिला विचारू शकत नाहीत. तहसीलदार कचेरीच्या शेजारी तालुका पंचायत समिती कार्यालयात असलेले स्वच्छतागृह हे वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना लांब पडत असून तहसीलदार कार्यालयात कामासाठी येऊन स्वच्छता गृहासाठी तालुका पंचायत समिती कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे त्यांची नाराजीही आहे. महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना स्वच्छतागृहासाठी शेजारच्या कार्यालायात जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.


मी माझ्या मुलीच्या दाखल्याचे काम असल्याने तहसील कार्यालयात आली होती, पण या कार्यालयात स्वच्छतागृहाची सोय नसल्याने गैरसोय झाली. कार्यालयाबाहेर असलेले स्वच्छतागृह बंद होते. मग एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विचारले असता पंचायत समितीमध्ये जावे लागले.
- सुनीता ठाकूर, नागरिक, तारापूर


नागरिकांची सोय बाहेरील लायन्स क्लबने बांधलेल्या स्वच्छतागृहात करण्यात आली आहे. त्या स्वच्छतागृहात नळ आणि इतर सामान चोरी होत असल्याने ते सायंकाळी बंद करून सकाळी नागरिकांना खुले करण्यात येते. एखाद दिवस ते खोलण्याचे राहून गेले असेल.
- केशव तरंगे, निवासी नायब तहसीलदार, पालघर

Comments
Add Comment

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत,

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने