तहसील कार्यालय परिसरात स्वच्छतागृहाची सोय करण्याची जनतेकडून मागणी

  313

पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालयात सामान्य नागरिकांना स्वच्छतागृहाची सोय नसल्याने त्यांना इतरत्र जावे लागते. त्यामुळे स्वच्छता गृहाची सोय तहसीलदार कार्यालय परिसरात केली पाहिजे, अशी जनतेकडून मागणी केली जात आहे.



या पूर्वी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी कार्यालयाशेजारी स्वच्छतागृह होते, पण आता सामान्य नागरिकांसाठी ते कार्यालयाबाहेर सेवाभावी संस्थेने बांधले आहे. तेही तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बंद करून ठेवलेले असल्याने सामान्य नागरिकांना पंचायत समितीच्या स्वच्छता गृहा वापर करावा लागत आहे. तालुका पोलीस ठाणेही याच कार्यालयात असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.



आपल्या विविध प्रकारच्या कामांसाठी पालघर तहसीलदार कार्यालयात बाहेरगावांहून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. आता शालेयपूर्व दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. महिला तसेच वयोवृद्ध नागरिकांना स्वच्छतागृहाची आवश्यकता भासते. स्वच्छतागृह कुठे आहे? असे महिला विचारू शकत नाहीत. तहसीलदार कचेरीच्या शेजारी तालुका पंचायत समिती कार्यालयात असलेले स्वच्छतागृह हे वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना लांब पडत असून तहसीलदार कार्यालयात कामासाठी येऊन स्वच्छता गृहासाठी तालुका पंचायत समिती कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे त्यांची नाराजीही आहे. महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना स्वच्छतागृहासाठी शेजारच्या कार्यालायात जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.


मी माझ्या मुलीच्या दाखल्याचे काम असल्याने तहसील कार्यालयात आली होती, पण या कार्यालयात स्वच्छतागृहाची सोय नसल्याने गैरसोय झाली. कार्यालयाबाहेर असलेले स्वच्छतागृह बंद होते. मग एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विचारले असता पंचायत समितीमध्ये जावे लागले.
- सुनीता ठाकूर, नागरिक, तारापूर


नागरिकांची सोय बाहेरील लायन्स क्लबने बांधलेल्या स्वच्छतागृहात करण्यात आली आहे. त्या स्वच्छतागृहात नळ आणि इतर सामान चोरी होत असल्याने ते सायंकाळी बंद करून सकाळी नागरिकांना खुले करण्यात येते. एखाद दिवस ते खोलण्याचे राहून गेले असेल.
- केशव तरंगे, निवासी नायब तहसीलदार, पालघर

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत

४० हजार पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा

जून महिन्यातही पाणीटंचाई कायम पालघर : जिल्ह्यातील मोखाडा, वाडा, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाई जून

नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य

युवक ठरला नियोजनशून्य व्यवस्थेचा बळी!

दुसऱ्याची चूक जयेशच्या जीवावर बेतली विरार: विजेच्या धक्क्याने अर्नाळा येथे मृत्यू झालेल्या जयेश घरत हा केवळ

५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ

भातशेतीपेक्षा बांबूशेती करण्याचे आवाहन पालघर : संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना दुर्गम

घरकुलासाठी ९१,९९१ कुटुंबाचे सर्वेक्षण !

१८ जूनपर्यंत आणखी मुदतवाढ; नागरिकांना मिळणार हक्काचे घर पालघर : "सर्वांसाठी घरे" शासनाच्या या धोरणाची यशस्वी