दिल्लीसाठी करो या मरो

तगड्या गुजरातला नमविण्याचे आव्हान


अहमदाबाद (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक राहिला आहे. त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात गुजरातचा संघ तगडा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


पृथ्वी शॉ, सरफराज खान यांच्यासह संघातील फलंदाजांना धावा जमवण्यात येत असलेल्या अपयशामुळे दिल्लीने आठपैकी सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. दिल्लीला आता प्ले ऑफ मध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित सर्व सहा सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. परंतु संघातील खेळाडूंची कामगिरी पाहता दिल्लीची वाट बिकट आहे. कर्णधार डेविड वॉर्नर धावा जमवत आहे, परंतु त्याच्या आक्रमकतेची धार कमी झाली आहे. त्याचा फटका संघाला बसत आहे. चांगलाच फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल, मनीष पांडे यांच्याकडून दिल्लीला अपेक्षा आहेत.


दुसरीकडे गुजरात सध्या चांगलाच फॉर्मात आहे. गुजरातने गत सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला १३ चेंडू राखून पराभवाचा चेहरा पहायला लावला. विजय शंकरने या सामन्यात डेविड मिलरसोबत सर्वश्रेष्ठ खेळी खेळली. गुजरातचा यंदाच्या हंगामातील प्रवास पाहिल्यास प्ले ऑफ मधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित आहे. त्यांनी आठपैकी सहा सहा सामने आपल्या बाजूने वळवले आहेत. गुजरातला हरवणे कोणत्याही संघासाठी सोपे काम नसेल. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता दिल्लीविरुद्ध गुजरातचे पारडे जड मानले जात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर गुजरातचा संघ सरस आहे. गोलंदाजीत राशिद खान आणि नूर अहमद चांगली भूमिका बजावत आहेत.

Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.