अहमदाबाद (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक राहिला आहे. त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात गुजरातचा संघ तगडा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
पृथ्वी शॉ, सरफराज खान यांच्यासह संघातील फलंदाजांना धावा जमवण्यात येत असलेल्या अपयशामुळे दिल्लीने आठपैकी सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. दिल्लीला आता प्ले ऑफ मध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित सर्व सहा सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. परंतु संघातील खेळाडूंची कामगिरी पाहता दिल्लीची वाट बिकट आहे. कर्णधार डेविड वॉर्नर धावा जमवत आहे, परंतु त्याच्या आक्रमकतेची धार कमी झाली आहे. त्याचा फटका संघाला बसत आहे. चांगलाच फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल, मनीष पांडे यांच्याकडून दिल्लीला अपेक्षा आहेत.
दुसरीकडे गुजरात सध्या चांगलाच फॉर्मात आहे. गुजरातने गत सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला १३ चेंडू राखून पराभवाचा चेहरा पहायला लावला. विजय शंकरने या सामन्यात डेविड मिलरसोबत सर्वश्रेष्ठ खेळी खेळली. गुजरातचा यंदाच्या हंगामातील प्रवास पाहिल्यास प्ले ऑफ मधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित आहे. त्यांनी आठपैकी सहा सहा सामने आपल्या बाजूने वळवले आहेत. गुजरातला हरवणे कोणत्याही संघासाठी सोपे काम नसेल. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता दिल्लीविरुद्ध गुजरातचे पारडे जड मानले जात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर गुजरातचा संघ सरस आहे. गोलंदाजीत राशिद खान आणि नूर अहमद चांगली भूमिका बजावत आहेत.
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…
तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…
आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…
एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी…
मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची…