दिल्लीसाठी करो या मरो

तगड्या गुजरातला नमविण्याचे आव्हान


अहमदाबाद (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक राहिला आहे. त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात गुजरातचा संघ तगडा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


पृथ्वी शॉ, सरफराज खान यांच्यासह संघातील फलंदाजांना धावा जमवण्यात येत असलेल्या अपयशामुळे दिल्लीने आठपैकी सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. दिल्लीला आता प्ले ऑफ मध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित सर्व सहा सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. परंतु संघातील खेळाडूंची कामगिरी पाहता दिल्लीची वाट बिकट आहे. कर्णधार डेविड वॉर्नर धावा जमवत आहे, परंतु त्याच्या आक्रमकतेची धार कमी झाली आहे. त्याचा फटका संघाला बसत आहे. चांगलाच फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल, मनीष पांडे यांच्याकडून दिल्लीला अपेक्षा आहेत.


दुसरीकडे गुजरात सध्या चांगलाच फॉर्मात आहे. गुजरातने गत सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला १३ चेंडू राखून पराभवाचा चेहरा पहायला लावला. विजय शंकरने या सामन्यात डेविड मिलरसोबत सर्वश्रेष्ठ खेळी खेळली. गुजरातचा यंदाच्या हंगामातील प्रवास पाहिल्यास प्ले ऑफ मधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित आहे. त्यांनी आठपैकी सहा सहा सामने आपल्या बाजूने वळवले आहेत. गुजरातला हरवणे कोणत्याही संघासाठी सोपे काम नसेल. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता दिल्लीविरुद्ध गुजरातचे पारडे जड मानले जात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर गुजरातचा संघ सरस आहे. गोलंदाजीत राशिद खान आणि नूर अहमद चांगली भूमिका बजावत आहेत.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या