बीसीसीआयने केली मोठी खेळी, पाकिस्तानचा अहंकारच तोडला

  148

नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणजेच पीसीबीच्या आडमुठेपणामुळे आशिया चषक जवळजवळ रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आशिया चषकावर तोडगा म्हणून भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने पीसीबी समोर ठेवला होता. पण पीसीबी त्यांच्या आडमुठेपणा सोडायला तयार नाही त्यामुळे भारतानेच आता नवी खेळी खेळली आहे.


बीसीसीआय आता पाच देशांची स्पर्धा भारतात खेळवणार आहे. जय शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, पीसीबी त्यांच्या मतावर अडून राहिल्यास आशिया चषक रद्द केला जाईल आणि बीसीसीआय त्या विंडोमध्ये पाच देशांना घेऊन भारतात एक स्पर्धा खेळवेल.


२०१८मध्ये आशिया चषक भारतात होणार होता, परंतु पाकिस्तानने येण्यास नकार दिल्याने तो संयुक्त अरब अमिराती येथे खेळवला गेला. असेच काहीसे यंदाही होणे अपेक्षित होते. दोन आठवड्यापूर्वी शहा यांनी आशिया चषकाच्या तयारीबाबत पीसीबीकडे अहवाल मागितला होता. त्यात त्यांनी आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या ठिकाणाबाबत अजूनही कोणतीच माहिती देण्यात न आल्याचे नमुद केले होते. पाकिस्तानच्या या अशाप्रकारच्या हेकेखोरपणामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी