नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणजेच पीसीबीच्या आडमुठेपणामुळे आशिया चषक जवळजवळ रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आशिया चषकावर तोडगा म्हणून भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने पीसीबी समोर ठेवला होता. पण पीसीबी त्यांच्या आडमुठेपणा सोडायला तयार नाही त्यामुळे भारतानेच आता नवी खेळी खेळली आहे.
बीसीसीआय आता पाच देशांची स्पर्धा भारतात खेळवणार आहे. जय शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, पीसीबी त्यांच्या मतावर अडून राहिल्यास आशिया चषक रद्द केला जाईल आणि बीसीसीआय त्या विंडोमध्ये पाच देशांना घेऊन भारतात एक स्पर्धा खेळवेल.
२०१८मध्ये आशिया चषक भारतात होणार होता, परंतु पाकिस्तानने येण्यास नकार दिल्याने तो संयुक्त अरब अमिराती येथे खेळवला गेला. असेच काहीसे यंदाही होणे अपेक्षित होते. दोन आठवड्यापूर्वी शहा यांनी आशिया चषकाच्या तयारीबाबत पीसीबीकडे अहवाल मागितला होता. त्यात त्यांनी आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या ठिकाणाबाबत अजूनही कोणतीच माहिती देण्यात न आल्याचे नमुद केले होते. पाकिस्तानच्या या अशाप्रकारच्या हेकेखोरपणामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…