बीसीसीआयने केली मोठी खेळी, पाकिस्तानचा अहंकारच तोडला

नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणजेच पीसीबीच्या आडमुठेपणामुळे आशिया चषक जवळजवळ रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आशिया चषकावर तोडगा म्हणून भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने पीसीबी समोर ठेवला होता. पण पीसीबी त्यांच्या आडमुठेपणा सोडायला तयार नाही त्यामुळे भारतानेच आता नवी खेळी खेळली आहे.


बीसीसीआय आता पाच देशांची स्पर्धा भारतात खेळवणार आहे. जय शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, पीसीबी त्यांच्या मतावर अडून राहिल्यास आशिया चषक रद्द केला जाईल आणि बीसीसीआय त्या विंडोमध्ये पाच देशांना घेऊन भारतात एक स्पर्धा खेळवेल.


२०१८मध्ये आशिया चषक भारतात होणार होता, परंतु पाकिस्तानने येण्यास नकार दिल्याने तो संयुक्त अरब अमिराती येथे खेळवला गेला. असेच काहीसे यंदाही होणे अपेक्षित होते. दोन आठवड्यापूर्वी शहा यांनी आशिया चषकाच्या तयारीबाबत पीसीबीकडे अहवाल मागितला होता. त्यात त्यांनी आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या ठिकाणाबाबत अजूनही कोणतीच माहिती देण्यात न आल्याचे नमुद केले होते. पाकिस्तानच्या या अशाप्रकारच्या हेकेखोरपणामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे